मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर: दिनांक ०९/०६/२०२१ रोजी शिवशाही शेतकरी संघटना या संघटनेचे इंदापुर नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष मा.श्री.अरविंद(तात्या)वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नितीन दादा आरडे यांनी याप्रसंगी संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत माहिती दिली.  यावेळी पुणे जिल्हा आरपीआय संघटन सचिव शिवाजीराव मखरे, आर पी आयचे बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर पी आयचे इंदापूर तालुका अध्यक्ष संदिपान कडवळे सर,  समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण आरपीआयचे शहराध्यक्ष अमोल मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शिवशाही शेतकरी संघटना भूमिका

 आज संपूर्ण भारत देशातील शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. एका बाजूला अवर्षण अतिवृष्टी अस्मानी संकट तर दुसर्‍या बाजूला शासनाची शेतकरी विरोधी धोरणे यामुळे कृषिप्रधान असलेला देश अक्षरशः  कंगाल होण्याची वेळ आली आहे. 

शेतीवर आधारलेले उद्योगधंदे धनदांडग्या आणि जात दांडग्या जमातीने स्वतःच्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नागवले आहे. त्यांची लूट केली आहे व पुन्हा सहकारी संस्था कर्जबाजारी करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला शेतीचे कर्ज तर दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांचे कर्ज अशा कैची मध्ये आज महाराष्ट्रातील शेतकरी सापडलेला आहे.

 सत्तेच्या गाद्या उबवून सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची लूट करणारी यंत्रणा उभी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सहकार आणि साखर सम्राटांनी केला.

 एफ आर पी व एम एस पी च्या बाबत शेतकऱ्यांनी कितीही पाठपुरावा केला तरी ह्या महाभागांनी कधीही त्यास दाद दिली नाही.
 सहकाराच्या सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे दुष्ट चक्र यांनी निर्माण करून सत्तेचा उपभोग घेतला व शेतकऱ्यांना भिकेला लावले.
 या पूर्वीपासून अनेक शेतकऱ्यांच्या संघटना कार्यरत आहेत. परंतु त्या शेतकऱ्यांचे हित कमी आणि कारखानदार भांडवलदारांचे हित जास्त जपण्याच्या प्रयत्नात असतात/ ही वस्तुस्थिती आहे. जे कारखाने किंवा ज्या सहकारी संस्था कर्जबाजारी झाल्या आहेत. त्या कर्जबाजारी का झाल्या ? त्याचा हिशोब द्यायला कुणी तयार नाही. व शेतकऱ्यांच्या नावाने संघटना चालवणारे दर पंचवार्षिक ला आपल्याला आमदारकी खासदारकी मिळावी म्हणून भांडवलदारांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत आहेत.

 एकूणच शेतकरी सर्व बाजूने नाडवला जात आहे. त्यामध्ये उच्चजातीय शेतकऱ्यांचे लागेबांधे हे भांडवलदार राजकारण्यांशी असल्याने त्यांच्या समस्यांचे निराकरण सहज शक्य होते.

 परंतु अल्पभूधारक, सीमांत, अनुसूचित जाती/ जमाती, इतर मागास वर्ग जाती गटातील शेतकरी मात्र समस्यांचे निराकरण करू शकत नाही. बाजारपेठेत याची पत नसल्यामुळे खाजगी सावकाराकडे त्याला हात पसरावा लागतो. त्यातून त्याचे प्रचंड शोषण होते व त्याला कुणीही वाली राहिलेला नाही.

 अशा काळामध्ये अल्पभूधारक, सीमांत, अनुसूचित जाति /जनजाति, आदिवासी  इतर मागास वर्गीय शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी व शिवछत्रपतींच्या स्वप्नातील कृषिप्रधान राज्याची निर्मिती करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटना कटिबद्ध असेल.आसे मत अध्यक्ष नितीन दादा आरडे यांनी व्यक्त केले, हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून  सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...