मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज,

इंदापूर:- कृषी पंतप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशातील  शेती आणि शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून प्रत्येकच राजकीय पक्षाने सत्ता मिळवली शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आहेत परंतु त्या संघटनांमध्ये मतभेद आहेत, खरेतर शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामामध्ये मतभेदांना स्थान नसायला हवे होते असो आजचा शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे,शेती व जोड धंदे तोट्याची झाले आहेत एका बाजूला शेतीमध्ये उत्पादन घेतले तर हमी भाव नाही शेतीमध्ये हमीभाव नाही म्हणून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन हे व्यवसाय बेभरवशाचे आहेत, दुधाला भाव नाही दूध शेतकऱ्यांचे मलई मात्र डेरी चालक खातात, आसे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील याांनी व्यक्त केले,यावेेळी ते म्हणाले की, शेळी पालन कुकुटपालन ची तीच अवस्था कोंबड्या पाळाव्यात तर थेट शेतकऱ्याकडून कोणीही घेत नाही घ्यायला गेले तर 
बाजारभावापेक्षा दोन रुपये कमीच किंमत अगदी भाजीपाला शेतामध्ये केला तर आठवडे बाजारात विकायला तर बाजारात आलेले पांढरपेशे दहा रुपयाची मेथीची पेंडी पाच रुपयाला मागतात तिकडे 699 रुपयाचा मोबाईल रिचार्ज करताना कधी कुठल्या कंपनीला म्हणत नाहीत ची 699 चा रिचार्ज सहाशे पाच रुपयाला करा पण शेतकरी म्हटलं की यांच्या व्यवहार ज्ञानाला उधाण येते व तरकारी मध्ये किती पैसे वाचवले हे आवर्जून सांगितले जाते आज डिझेल महाग झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीची मशागत ही महाग होते एकूणच शेती उत्पादनाच्या प्रक्रियेवर खूप मोठा गंभीर परिणाम डिझेलच्या महागाईमुळे होतो परंतु याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे दहा रुपयाचा कांदा वीस रुपये किलो झाला की गृहिणींचे बजेट बिघडते इथे 70 रुपयाचे पेट्रोल 100 रुपयाच्या पलीकडे गेले पण बजेट कुणाशीच बिघडत नाही उलट देशाचे बजेट सुधारते एकूणच व्यवस्थेमध्ये शेतकरी प्रचंड भरडला जात आहे या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण लढा उभारत आहोत साथ द्या, हात द्या असे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील यांनी व्यक्त केले, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...