मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज,

इंदापूर:- कृषी पंतप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशातील  शेती आणि शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून प्रत्येकच राजकीय पक्षाने सत्ता मिळवली शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आहेत परंतु त्या संघटनांमध्ये मतभेद आहेत, खरेतर शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामामध्ये मतभेदांना स्थान नसायला हवे होते असो आजचा शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे,शेती व जोड धंदे तोट्याची झाले आहेत एका बाजूला शेतीमध्ये उत्पादन घेतले तर हमी भाव नाही शेतीमध्ये हमीभाव नाही म्हणून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन हे व्यवसाय बेभरवशाचे आहेत, दुधाला भाव नाही दूध शेतकऱ्यांचे मलई मात्र डेरी चालक खातात, आसे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील याांनी व्यक्त केले,यावेेळी ते म्हणाले की, शेळी पालन कुकुटपालन ची तीच अवस्था कोंबड्या पाळाव्यात तर थेट शेतकऱ्याकडून कोणीही घेत नाही घ्यायला गेले तर 
बाजारभावापेक्षा दोन रुपये कमीच किंमत अगदी भाजीपाला शेतामध्ये केला तर आठवडे बाजारात विकायला तर बाजारात आलेले पांढरपेशे दहा रुपयाची मेथीची पेंडी पाच रुपयाला मागतात तिकडे 699 रुपयाचा मोबाईल रिचार्ज करताना कधी कुठल्या कंपनीला म्हणत नाहीत ची 699 चा रिचार्ज सहाशे पाच रुपयाला करा पण शेतकरी म्हटलं की यांच्या व्यवहार ज्ञानाला उधाण येते व तरकारी मध्ये किती पैसे वाचवले हे आवर्जून सांगितले जाते आज डिझेल महाग झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीची मशागत ही महाग होते एकूणच शेती उत्पादनाच्या प्रक्रियेवर खूप मोठा गंभीर परिणाम डिझेलच्या महागाईमुळे होतो परंतु याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे दहा रुपयाचा कांदा वीस रुपये किलो झाला की गृहिणींचे बजेट बिघडते इथे 70 रुपयाचे पेट्रोल 100 रुपयाच्या पलीकडे गेले पण बजेट कुणाशीच बिघडत नाही उलट देशाचे बजेट सुधारते एकूणच व्यवस्थेमध्ये शेतकरी प्रचंड भरडला जात आहे या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण लढा उभारत आहोत साथ द्या, हात द्या असे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील यांनी व्यक्त केले, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...