मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर:- येथील उपजिल्हा रूग्णालयात 6 ते 8 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करत आहे त्यांचे पगार हे नियमित होत नाहीत हे कामगार सांगेल ते काम दवाखान्यात करतात आणि पेशंटला सहकार्य करतात करोना काळात सर्वात जास्त काम या कर्मचारी वर्गाने केले त्या काळात त्यांना ही पेमेंट वाढवून द्यायला हवा होता अशा वेळेस कोणी काम करत नाही त्या करोनाच्या काळात ही त्यांनी कामे केली . या सर्व कंत्राटी कामगारांना सद्या 7 हजार रुपये मासिक ( महिना ) पगार पडतो या पगार मध्ये त्यांचा प्रपंचाही भागात नाही त्यांना ही पेमेंट वाढले पाहिजे,आसे मत प्रकाश पवार प्रमुख विचार मंथन ग्रुप यांनी व्यक्त केले, ते म्हणाले की त्यांचे पेमेंट वाढत नाही याचे कारण तेथे काँन्ट्रक्टर नाही या कामगारांचे पगार सरकारी दवाखान्याच्या डिपार्टमेंट मार्फत आरोग्य जनकल्याण या संस्थेमार्फत काढले जाते असे समजते . त्यांचे पेमेंट वाढण्यासाठी त्यांचे टेंडर निघाले पाहिजेत टेंडर निघाल्याने पेमेंट वाढू शकते व पेमेंट वेळेनुसार होऊ शकते असे आम्हाला वाटते . टेंडर का काढत नाहीत यात संशयास्पद वाटते कित्येक दिवस हे कामगार 7 हजार रुपये मध्ये काम करणार ?
भविष्यात टेंडर काढावे व गोरगरीब कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा दिला पाहिजे असेही पवार म्हणाले, 
प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार काढावेत .
भविष्यात टेंडर पदधत काढावी नाही तर 
अन्यथा आंदोलन केले जाईल .आसेही मत पवार यांनी व्यक्त केले 
 ते पुढे म्हणाले की 
2 वर्षापासून इंदापूरला अधिक्षक नाही सध्या डॉ.एकनाथ  चंदनशिवे  हे काम पाहत होते  मात्र ते सेवानिवृत्त होणार होते म्हणून  डॉ.सुहास शेळके यांनी  पदभार स्वीकारला आहे.त्यांचे काम चांगले आहे. परंतु जे डॉक्टर सरकारी दवाखान्यात कामावर आहेत त्यांची स्वतःची opd नसावी मग ते opd कशी चालवतात त्या दवारवान्यात टेंडर पद्धत नाही मग टेंडर भरती कोणी केली टेंडर कोणाच्या नावाने आहे ते असेल तर ११ महिन्याचे टेंडर असायला हवे त्यांचे पगार अंदाजे कसे काढले जातात किती कामगार टेंडर मध्ये आहेत व किती लोकांचे वाढऊन बिले काढली जातात हा प्रकार उघडकीस येणे महत्त्वाचे आहे,  इंदापूरातील जे डॉक्टर कामावर आहेत ते डॉक्टर पुर्ण वेळ काम करत नाही त्यांना सतत फोन करून बोलवावे लागते तो पर्यंत पेशंटचे खूप हाल होतात काहीना मृत्यु पत्कारावा लागतो इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालय हे चांगले आहे मात्र वरिष्ट पातळीवर न लक्ष घातले पाहिजे ...
कामगारांचे पगार त्वरित द्या, अन्यथा आंदोलन केले जाईल आसा इशारा प्रकाश पवार प्रमुख विचार मंथन ग्रुप इंदापूर यांनी दिला आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते