मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:-शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य*
शासनाचा कृषी विभाग नेमके काय करतो ?आपला देश कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे. असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. मग त्या शेतीच्या विकासासाठी जे कृषी खाते आहे ते नेमके शेतकऱ्यांसाठी काय करते. हा संशोधनाचा विषय झाला आहे.*

 *खरीप हंगाम, रब्बी हंगाम येतात आणि जातात परंतु कृषी खात्याच्या कार्यालयात मात्र ठराविक शेतकरी असतात. ठराविक योजना असतात व त्या ठराविक लोकांनाच मिळतात. त्या मिळत असताना संबंधित हे अर्थपूर्ण संबंध ठेवत असतात. ही बाब आता उघड झाली आहे.*

 *कृषी विभागातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक हे बहुदा बांधावर कधीच जात नाहीत. कारण ते साहेब झाले असल्यामुळे त्यांना शासन नियमित पगार देते बांधावर गेल्याचा अहवाल तयार करण्याचा पगार मिळतो की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.*

 *म्हणजे कृषी विभागाच्या जोरावर  इथल्या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात क्रांती करावी ते कृषी विभागातील अधिकारी मात्र दरमहा मिळणारा पगार व इतर काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतो.*

 *अलीकडच्या काळामध्ये कृषी सेवा केंद्रांचे मोठे पीक आले आहे. शेतात पिक नाही पण कृषी सेवा केंद्र मात्र भरमसाठ वाढली आहेत. शेतकऱ्यांची मुले शासकीय,  खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, महाविद्यालयातून, मुक्त विद्यापीठातून कृषी पदविकाधारक पदवीधारक होत आहेत. व कृषी सेवा केंद्र टाकताहेत. गंमत म्हणजे एका कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारची खते औषधे विकली जातात. त्यांच्या दर्जा व गुणवत्तेबद्दल खूप मोठी जाहिरात केली जाते. परंतु त्याचा उचित परिणाम झाला नाही तर हे कृषी विद्वान शेतकऱ्यांना हवामान, माती, वातावरण याचा परिणाम आहे असे सांगतात.*
*म्हणजे एका बाजूला शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. तर दुसर्‍या बाजूला कृषी सेवा केंद्र संचालक शेतकऱ्यांची लूट करत आहे. बऱ्याच कृषी सेवा केंद्रावर कृषी पदवी धारक असत नाहीत. त्या ठिकाणी मदतनीस म्हणून लावलेली मुले दुकाने चालवतात. तर काही ठिकाणी मदतनीस मुलांनीच कृषी पदवीधारकांशी भागिदारी करार करून स्वतः ची दुकान उभारले आहेत हे प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकारी कर्मचारी यांना माहित आहे.

परंतु त्यांना नियमितपणे हप्ता मिळत असल्याने ते कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू शकत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांचे शोषण करण्याची व्यवस्था ज्यांच्या अस्तित्वामुळे मोडू शकते ते स्वतः जर शोषणाच्या प्रक्रियेत सामील असतील तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे. ?*

 *या सर्व विषयांना वाचा फोडण्यासाठी, व कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांना अन्याय मुक्त करण्यासाठी "शिवशाही शेतकरी संघटने" मध्ये सामील व्हा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...