मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:-शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य*
शासनाचा कृषी विभाग नेमके काय करतो ?आपला देश कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे. असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. मग त्या शेतीच्या विकासासाठी जे कृषी खाते आहे ते नेमके शेतकऱ्यांसाठी काय करते. हा संशोधनाचा विषय झाला आहे.*

 *खरीप हंगाम, रब्बी हंगाम येतात आणि जातात परंतु कृषी खात्याच्या कार्यालयात मात्र ठराविक शेतकरी असतात. ठराविक योजना असतात व त्या ठराविक लोकांनाच मिळतात. त्या मिळत असताना संबंधित हे अर्थपूर्ण संबंध ठेवत असतात. ही बाब आता उघड झाली आहे.*

 *कृषी विभागातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक हे बहुदा बांधावर कधीच जात नाहीत. कारण ते साहेब झाले असल्यामुळे त्यांना शासन नियमित पगार देते बांधावर गेल्याचा अहवाल तयार करण्याचा पगार मिळतो की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.*

 *म्हणजे कृषी विभागाच्या जोरावर  इथल्या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात क्रांती करावी ते कृषी विभागातील अधिकारी मात्र दरमहा मिळणारा पगार व इतर काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतो.*

 *अलीकडच्या काळामध्ये कृषी सेवा केंद्रांचे मोठे पीक आले आहे. शेतात पिक नाही पण कृषी सेवा केंद्र मात्र भरमसाठ वाढली आहेत. शेतकऱ्यांची मुले शासकीय,  खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, महाविद्यालयातून, मुक्त विद्यापीठातून कृषी पदविकाधारक पदवीधारक होत आहेत. व कृषी सेवा केंद्र टाकताहेत. गंमत म्हणजे एका कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारची खते औषधे विकली जातात. त्यांच्या दर्जा व गुणवत्तेबद्दल खूप मोठी जाहिरात केली जाते. परंतु त्याचा उचित परिणाम झाला नाही तर हे कृषी विद्वान शेतकऱ्यांना हवामान, माती, वातावरण याचा परिणाम आहे असे सांगतात.*
*म्हणजे एका बाजूला शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. तर दुसर्‍या बाजूला कृषी सेवा केंद्र संचालक शेतकऱ्यांची लूट करत आहे. बऱ्याच कृषी सेवा केंद्रावर कृषी पदवी धारक असत नाहीत. त्या ठिकाणी मदतनीस म्हणून लावलेली मुले दुकाने चालवतात. तर काही ठिकाणी मदतनीस मुलांनीच कृषी पदवीधारकांशी भागिदारी करार करून स्वतः ची दुकान उभारले आहेत हे प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकारी कर्मचारी यांना माहित आहे.

परंतु त्यांना नियमितपणे हप्ता मिळत असल्याने ते कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू शकत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांचे शोषण करण्याची व्यवस्था ज्यांच्या अस्तित्वामुळे मोडू शकते ते स्वतः जर शोषणाच्या प्रक्रियेत सामील असतील तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे. ?*

 *या सर्व विषयांना वाचा फोडण्यासाठी, व कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांना अन्याय मुक्त करण्यासाठी "शिवशाही शेतकरी संघटने" मध्ये सामील व्हा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...