मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

खाद्य तेलाच्या दरात घट झाल्याने,पुन्हा जेवणात चमचमीत पदार्थ येणार,आसल्याने गृहीणी खुष 


इंदापूर:- कोरोना काळात खाद्यतेलाच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना बसत होती. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाची आवक वाढल्याने खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. इंदापूर शहरात १६० रुपये प्रतिकिलो मिळणारे सोयाबीन तेल आता १४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे.

कोरोनामुळे जागितक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलाची आवक कमी होत गेली होती. त्यामुळे देशभरात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीही चांगल्याच भडकल्या होत्या. अगोदरच कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. कामगारांच्या हाताचे काम गेले. शासनाने जाहीर केलेली मदतही वेळेत पोहोचली नसल्याने घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती

आता निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अशात खाद्यतेलाच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. जेवणातून चमचमीत पदार्थ गायब झाले होते. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारात खाद्यतेलाची आवक होत असल्याने खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचे बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. इंदापूर  बाजारपेठेत करडई खाद्यतेलवगळता इतर खाद्यतेलांच्या किमतीमध्ये जवळपास १८ ते २० रुपयांपर्यंत घट झाल्याचे किराणा दुकानदार दिपकराव खिलारे  यांनी सांगितले.

गृहिणींचे बजेट कोलमडले

खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. जेवणातून तळीव पदार्थ गायब झाले होते. अर्धे बजेट खाद्यतेल खरेदीत खर्च होत असल्याने चांगलीच काटकसर करावी लागत आहे. आता किंचित घट झाली असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

पूर्वी करडईचे उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढे करडईचे तेल घाण्यावरून काढून आणले जात होते. मात्र, करडईचे पीक काढण्यासाठी फारसे मजूर मिळत नसल्याने आता पीक घेणे कमी झाले आहे. त्यामुळे आता विकतचे तेल आणावे लागत आहे.

- हमिदभाई आतार

सूर्यफूल, शेंगदाणा, करडईचे पीक चांगले येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी वर्षभर पुरेल एवढे खाद्यतेल राहात होते. आता सर्व शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे विकतचे तेल आणावे लागत आहे.

- प्रदीप (आण्णा) पवार

खाद्यतेलाचे आधीचे व आताचे दर

सोयाबीन १६० - १४०

सूर्यफूल - १८० - १६०

शेंगदाणा १८० - १६०

पामतेल १५० - १३०

करडई २०० - २००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...