इंदापूर:-तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उजनी धरणासमोरील आंदोलनाचा आजचा 11वा दिवस पीपल्स रिपब्लिकन पार्ट च्या वतीने उजनी धरण तरटगाव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या जमिनी येथील गाव गुंडांनी आणि धनदांडग्यांनी कसू दिल्या नाहीत त्या जमीनी दमदाटी करून खरेदी करून घेतल्या आणि धरणग्रस्तांना येथून हाकलून लावले त्या जमिनीच्या खरेदी रद्द करून त्या जमिनी परत धरणग्रस्तांना देण्यात यावे, मराठवाड्याचा महाकाय बोगदा बेकायदेशीररित्या चालू आहे तात्काळ त्याचं काम थांबावे मराठवाड्यासाठी 21 टीएमसी चेक केलेली तरतूद रद्द करावी या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.आशी माहिती मा.संजय भैया सोनवणे,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी दिली या वेळी ते म्हणाले की तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही,सोनवणे म्हणाले की प्रशासनातील मुर्दाड अधिकारी मुग गिळून गप्प का बसतात,पाणी आमच्या हक्काचे आसून प्रशासन दिसून आंधळे आसल्याचे सोंग घेऊन गप्प का?आसे ही सोनवणे म्हणाले, दि. १६/६/२०२१च्या दांडा अंदोलनाला तालुक्यातील गावागातील शर्व शेतक-यांनी एकजूट दाखवून घरूनच दांडा घेऊन यावे आसे आवाहन संजय भैय्या सोनवणे यांनी केले आहे, हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून ,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पाडणार आहे.
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या