मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्याचेे आमदार व राज्यमंत्री तथा 
सोलापूर जिल्हाचे पालक मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन ५ टि एम.सी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच निर्णय मंजुर झाला होता. तो निर्णय सोलापूर जिल्हयातील लोकप्रतीनिधी व शेतकरी नेते एकत्रीत येवून  शासन निर्णय रद्द  करण्यास शासनास भाग पाडले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, आशी मागणी संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी केली आहे, आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील  जे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सोलापूर  जिल्हयातील लाभक्षेत्र जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या जमिनी तेथील मुळ मालकांनी इंदापुर तालुक्यातील शेतक-यांस कसू दिल्या नाहीत. जिवेमारण्याची धमकी देवुन मिळालेल्या जमिनीचे खरेदीखत करून घेतले सोलापूर जिल्हयातील शेतकरी नेत्यांना आव्हान आहे.अधिकारी यांची  इनकॅमेरा नार्कोटेस्ट करून घ्या,आमची कशी फसवणूक झाली हे समजेल व त्याचे उत्तर आता जे शेतकरी नेते. इंदापूर, तहसिलकचेरी समोर आमच्या हक्काचे पाणी आम्ही इंदापूर तालुक्यातील २२ गावाच्या  पाणी मिळवुन देवू हे नाटक करीत आहेत. ही नौटंकी आम्ही चालू देणार नाही  व  महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे १६ जून रोजी होत असले बेमुदत धरणे आंदोलन उधळून लावणार आहोत. दांडा  अंदोलनात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधीकारी व भिमसैनिक  सामिल होणार आहेत. आमच्या हक्काची शेती  हिसकावून घेणा-यास आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पाय ठेवू देणार नाही व अंदोलन करूदेणार नाही. माझ्या तालूक्यातील शेतकरी यांच्या साठी आम्ही  सक्षम आहेत व आमच्या हक्काची भाकरी आम्ही आमच्या ताकदीवर मिळवणारच आहे.  आमची सहनशिलता संपली आहे. आता मोर्चा नाही, आता झेंडा नाही, आत्ता  त्याच झेंडयाचा दांडा  हातात घेवून या! शेतकरी नेत्यांना त्याचा जाब विचारणार आहोत  शेतकरी नेते आसाल तर लाभक्षेत्रातील जमीन  जप्तीचे गैडबगाल काय आहे?  आसेही संजय भैय्या सोनवणे म्हणाले, या निवेदनाच्या प्रती माहिती साठी वरीष्ठ स्तरांवर पाठवण्यात आल्या आहेत, प्रत्येक शेतक-यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी घरातून च दांडा घेऊन निघावे, आसे  आवाहन संजय  सोनवणे यांनी केले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...