मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर :एकीकडे तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातीलच गोखळी ग्रामस्थांचे आरोग्य मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहे, प्रशासनाने तात्काळ रिक्त असलेले आशा सेविकेचे पद  भरुन नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी गोखळी ग्रामपंचायतीच्या सदस्या नंदाबाई भानुदास चितळकर यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गोखळी गावचे ग्रामसेवक एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्र गोखळी गावापासून १७ किलोमीटर लांब अंतरावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली समिती कोणत्याही प्रकारचे काम करत नाही.अशा परिस्थितीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

शासनाने नेमलेली एकमेव आशा सेविका कोणतेही काम करत नाही. अगदी एखाद्या नागरिकाला थंडी, ताप, कणकणी अथवा जुलाब होत असल्यास प्राथमिक उपचाराचे औषधसुद्धा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरी आशा सेविका सरपंच असल्यामुळे आशा सेविका पदावरुन सन २०१९ मध्येच त्यांना बडतर्फी करण्यात आले आहे. त्यामुळे गोखळी गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे आरोग्याची सेवा उपलब्ध नाहीत, उपलब्ध आशा सेविका कोणतेही काम करत नसल्याने  चितळकरवस्ती, तरंगेवस्ती, खरातवस्ती, पारेकर-फडतरे वस्ती, अभंगवस्ती, गोफणेवस्ती, झगडेवस्ती येथील नागरिकांचे आरोग्य हे रामभरोसे आहे.

गोखळी गावच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या ही सध्या निरंक असली तरी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनासाठी तसेच दैनंदिन तपासणीसाठी कोणीही नसल्याने नागरिकांच्या आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढलेला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने रिक्त जागेबाबत पात्र अर्जदारांचे अर्ज मागवून आशा सेविकेचे पद तात्काळ भरुन नागरिकांच्या आरोग्यसेवेची व्यवस्था करावी व निष्क्रिय आशा सेविकेच्या कामाची सक्षम पथकाद्वारे चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी  मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...