मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील जनता कोरोनाच्या चक्रव्यूहात, लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या प्रचारात.

- जनतेत चर्चा आमदार दाखवा, पन्नास रुपये बक्षीस मिळवा.
इंदापूर : 

तालुक्यात एकीकडे कोरोनाने आणि हाहाकार माजवला आहे. बेडची, रुग्णवाहिका यांची संख्या अपुरी पडत आहे. उभारलेले कोविडसेंटर गच्च भरलेले आहेत. रुग्णांकरीता आवश्यक असणाऱ्या रेमडेसेवरचा इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याचा फायदा घेत काळा बाजार करणारी टोळी तयार झाली आहे. ते इंजेक्शन चक्क १२ हजार रुपयाला विकत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. जनता हतबल झाली आहे. असे असताना मात्र दुसरीकडे इंदापूर तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काही दिवसांपासून तालुक्यातून गायब झाले असल्याचे दृश्य आहे. 

इंदापूर तालुक्यातील शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शन संदर्भात फोन केला असता समोररील मेडिकल औषध दुकानादाराने १२ हजार रुपये द्या इंजेक्शन देतो. त्याचे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. त्याच वेळी त्या फोनवर बातचीत करताना गणेश घाडगे रुग्णवाहिका चालक निमगाव केतकी यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पीए यांनी घाडगे यांना मेसेज काय केला ? त्याचाही पुरावा उपलब्ध आहे. 
या रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटमध्ये कोण कोण बडे धेंडे आहेत हे लवकरच कळेल. 

इंदापूरचे विद्यमान आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्याच्या मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), इंदापूर मृदू व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय तसेच सामान्य प्रशासन या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी स्विकारलेले आ.भरणे यांची प्रशासनावर कोणत्याही प्रकारची मजबूत पकड नसल्यामुळे तालुक्यात सर्रास सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. कुठल्याच विभागातील अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

इंदापूर तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना बेडची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, सिरीयस रुग्णांना तालुक्याबाहेर, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. रुग्णवाहिकेची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचाराकरिता दाखल करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे सरकारी दवाखान्यातील डॉक्टर मंडळी हतबल झाली आहे. मंत्र्याचा प्रशासन यंत्रणेवर मजबूत पकड नसल्यामुळे बेफिकिरीने वागण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. इथे कुंपनच शेत खात असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात अशी परिस्थिती आहे. कोरोनाने हाहाकार माजला आहे. कुणाला बेड मिळत नाहीत तर कोणाला उपचारासाठी तासनतास झाडाखाली बसून वाट पहावी लागत आहे. अशी गंभीर परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली असताना या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मात्र शेजारील जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी कित्येक दिवसांपासून त्याठिकाणी तळ ठोकून असल्याचे दृश्य आहे. त्यांना त्यांच्या घरच्या जनतेच्या जीवापेक्षा त्यांना निवडणुक महत्वाची वाटत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. आता तर चक्क येथील जनता त्यांच्या तालुक्यातील उपस्थितीवर पैजा, बक्षिसे लावत आहेत. तालुक्यात आमदार दाखवा आणि पन्नास रुपये बक्षीस मिळवा...!

एकीकडे कोरोनाचे संकट आवासून उभे आहे तर दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे शेतकरी, व्यापारी वर्ग चिंतेत आहे. अशातच रुग्णांना रेमेडीसीवीर इंजेक्शन चढ्या दराने विकून गलेगठ्ठ होत आहेत. रुग्णाच्या जीवाच्या आकांताने नातेवाईकही नाईलाजाने चढ्या भावाने इंजेक्शन खरेदी करुन आपल्या घरातील सदस्याचा जीव वाचवण्याची धडपड करत आहेत. या संवेदनशील विषयाचा फायदा ही मंडळी घेत या इंजेक्शनचा काळा बाजार खुलेआम करुन माया गोळा करत आहेत. याकडे मात्र तालुक्याचे लोकप्रतिनींधीे डोळेझाक करत आहेत. 

आपल्या तालुक्यातील जनतेला या कोरोनाच्या संकटातून वाचवणे, त्यांना आरोग्याच्या उत्तम सोई उपलब्ध करुन देणे, या काळात चालणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालणे येथील लोकप्रतिनिधींचे आद्यकर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्यच ते विसरले असल्याचे दिसत आहे. 

त्यामुळे रेमेडीसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, तसेच चुकीचे काम करणाऱ्यांवर, जीवानीशी खेळणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे ही काळाची गरज आहे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याविषयावर ठोस पावले उचलून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा नाही तर इंदापूर तालुक्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, अशी चर्चा सामान्य जनतेतून पुढे येत आहे.

यामुळे तालुक्यात आमदार दाखवा आणि पन्नास रुपये बक्षीस मिळवा...! अशी चर्चा तालुक्यातील जनतेत आहे. 

====================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...