इंदापूर : कालकथित कमल विठ्ठल पोळ यांचे८१व्या वर्षी दि. १८/०३/२०२१ रोजी गुरुवारी सकाळी ९ : १५ वा. राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन सुना, बारा नातवंडे, सहा परतुंड असा परिवार असुन समता सैनिक दल या सामाजिक संघटनेचे पुणेजिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्या त्या मातोश्री होत्या. आयुष्याभर त्या त्यांच्या जीवनातील परिस्थितीशी संघर्ष करत राहिल्या पण कधीचं हार मानली नाही. त्या स्वत: निरक्षर असताना सुद्धा शिक्षणाला खुप महत्व देत होत्या म्हणून त्यांनी त्यांच्या परिस्थिति नुसार मुलांना जेमतेम शिक्षण दिले मात्र नातवंडांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले असून नातवंडांच्या पाठीमागे त्या अज्जी म्हणून खंबिरपणे उभ्या होत्या आज त्याचं आभाळमायेच्या अज्जी हरपल्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या