मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने ऊस पिकाची जोमदार वाढ

 इंंदापूर(दि. 21 फेब्रुवारी) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना तयार करीत असलेल्या सेंद्रिय खताचा वापर कार्यक्षेञातील शेतकरी वापर करीत असल्याने ऊसपिक जोमदार बहरले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी दिली. मौजे कालठण नं. 2 येथील प्रगतशिल शेतकरी श्री. सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी को.सी. 86032 या ऊस पिकासाठी कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने तसेच पडस्थळ, पिंपरी या भागातील प्लॉटची पाहणी पण या प्रसंगी करण्यात आली. या भागातील बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करुन सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणात वापर करीत असल्याचे शेतकरी श्री. सुदाम पाडुळे यांनी आवर्जुन सांगितले.


     प्लॉटवरती शेतक-यांना माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील व व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशा सेंद्रिय व जैविक खताचे उत्पादन सुरु असून दिवसेंदिवस यास सभासदांचा प्रतिसाद वाढत आहे. “कर्मयोगी शिवार फेरी” योजनेअंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जावुन शेतक-यांच्या अडीअडचणी समजुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. तसेच सभासदांनी मातीपरीक्षण तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक खते वापरण्याबाबत आवाहन केले. पर्यावरण व्यवस्थापक यांनी जमिनीचा कर्ब व सेंद्रिय खतांचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

     यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एस.जी.कदम, ऊसविकास अधिकारी गणेश पोळ, पर्यावरण व्यवस्थापक जे.व्ही.माने व कालठण भागातील विलास साहेबराव पाडुळे, सुनिल रामदास जगताप, गणेश गोविंद मेंगडे, राहूल लालासो जगताप, वर्षल मोहन पाडुळे, हारुन अब्दुल मुलाणी, आदिकराव भिमराव रेडके, संतोष बबन जगताप हे शेतकरी उपस्थित होते. सर्व उपस्थित ऊस उत्पादक सभासदांनी “कर्मयोगी शिवार फेरीचे” आभार व्यक्त केले व ही बाब कौतुकास्पद असलेचे नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते