मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

भारत मुक्ती मोर्चा चे संघटन कौशल्य व नेतृत्व विकास शिबीर संपन्न-अॅड राहुल मखरे 

इंदापूर:संघटन चालवण्यासाठी वेळ, पैसा, बुध्दी, हुनर आणि श्रम या साधन संसाधनाची आवश्यकता असते. बामसेफ_हे_सामाजिक_संघटन_आहे. प्रचलित व्यवस्था बहुजन समाज विरोधी आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी बहुजन महापुरुषांनी आपल्या जिवाची बाजी लावली. 

व्यवस्था परिवर्तनाची चळवळ चालवत असताना साधन संसाधनांची आवश्यकता असते. जर साधने पुंजीपतींकडून घेतली तर पुंजीपतींच्या मर्जीवर संघटन /पक्ष चालते. जो_सहारा_देता_है_वो_इशारा_भी_करता_है' म्हणजेच, पुंजीपतींच्या हितासाठीच संबंधित संघटनेला /पक्षाला काम करावे लागते. अश्या संघटना समाजविरोधी कारवाया करतात.

   परंतु, बामसेफ हे बहुजन समाजाच्या साधन संसाधनावर चालते. त्यामुळे बामसेफ हे समाजाप्रती इमानदार आहे. बामसेफ ने जो महापुरूषांच्या आंदोलनाचा उद्देश होता, तोच उद्देश निर्धारित केला आहे. अर्थातच बामसेफ हे समाजहितासाठी स्वाभिमानी लढाई लढत आहे. म्हणून सामाजिक इमानदारीची जाण असलेल्या इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, माढा आणि माळशिरस च्या कार्यकर्त्यांनी काल "दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर"  समारोप प्रसंगी १,००,०००(एक लाख रू.) चा निधी मा.डी.आर. ओहोळ यांचेकडे सुपूर्द केला. 

या कार्यक्रम चे उद्घाटन महेंद्र(दादा)रेडके (मा.सभापती, पचायत समिती, इंदापूर यांच्या हस्ते  करण्यात आले तर ,प्रमुख पाहुणे म्हणून मा. अॅड. राहुल मखरे,महासचिव बीएमपी ,  मा. पांडुरंग रायते अध्यक्ष शेतकरी संघटना, मा, सतिश(गोटू) पांढरे पंचायत समिती सदस्य, हे उपस्थित होते, या वेळी  अॅड. राहुल मखरे,महासचिव बहुजन मुक्ती पार्टी, हे बोलताना म्हणाले की, बुद्धाच्या प्रचार व  प्रसारामुळे शैक्षणिक,व सामाजिक क्रांती घडवली, आसेही ते म्हणाले, या कार्यक्रमचे प्रशिक्षक म्हणून  मा.डी.आर. ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव, बामसेफ नवी दिल्ली) यांचे दोन दिवशीय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,यावेळी मा. सुखदेव चव्हाण मा. नंदकुमार गायकवाड मा. आनंदराव थोरात मा. काकासाहेब जाधव मा. गोरकक्ष बारवकर,मा. संजय(डोनाल्ड) शिंदे मा. आर.आर. पाटील मा. नानासाहेब चव्हाण मा. बाबासाहेब भोंग मा.डॉ. दत्तात्रय जगताप मा. राहुल शिंगाडे मा.अँड. तुकाराम राऊत मा. निलेश बनकर ,मा. सुशिल अहिवळे मा. गोरख फुलारी मा. बाळासाहेब तोरमल मा. रिकेश चव्हाण ,मा. भारत दळवी मा. गौतम खरात मा. अशोक होले मा. कय्युम शेख मा. अतुल लंकेश्वर मा. नागेश वाघंबरे भा. अमोल मारकड मा. सौरभ वाघमारे मा. सिद्धार्थ लोंढे मा. नितीन गव्हाळे मा. लखन जाधव,वसीम शेख, सुरज धाईंजे  मा. जाफर शेख मा. संतोष भिसे 

मा. नागेश भोसले मा. आझाद(गौस) सय्यद मा. रोहित ढावरे मा. प्रशांत मखरे इत्यादी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम इंदापूर पंचायत समिती येथील शंकरराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते