मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

औरंगाबाद (मराठवाडा) विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांनी वेब पोर्टल बाबत केवळ सवंग प्रसिद्धीसाठी बेजबाबदार वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीकरीता इंदापूर (पुणे)  येथील वेब पोर्टल संपादक, पत्रकारांनी इंदापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
         यावेळी महा डिजिटल मीडिया असोसिएशन या डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या राज्यातील पहिल्या स्वः नियामक संस्थेचे पदाधिकारी संपादक धनंजय कळमकर, सुरेश जकाते, पत्रकार काकासाहेब मांढरे, कैलास पवार, श्रेयश नलवडे, जितेंद्र जाधव, इम्तियाज मुलाणी, सिद्धार्थ मखरे,विजय शिंदे आदी वेब पोर्टल व युट्यूब चॅनेल चे पत्रकार उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे औरंगाबाद (मराठवाडा) विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी बीड येथे व्याख्यानमालेत “ यूट्यूब आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यताप्राप्त पत्रकारिता नाही, अनेक प्रकरणात कार्यवाही करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे, हे मानांकित जर्नालिझम नाही ” असे वक्‍तव्य केले. 

वरील वक्तव्य देत असताना गणेश रामदासी यांनी भारताचे महामहीम राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केलेली अधिसूचना दि. ९ नोव्हेंबर २०२० चा अवमान केला असून डिजिटल मीडिया प्रकरणी कोणतीही माहिती नसताना केवळ सवंग प्रसिध्दीसाठी बेजबाबदार वक्‍तव्य करुन अकार्यक्षम अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे. हे त्यांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तीला अनुसरुन नाही. महामहीम राष्ट्रपती यांच्या अधिसूचनेविरूध्द बोलण्याची ही पहिली घटना असावी. 

देशातील विरोधी पक्ष सुध्दा महामहीम राष्ट्रपती यांच्या द्वारे काढलेल्या अधिसूचनेचा सन्मान करतात. किंबहूना तो करावाच लागतो. कायद्याने हे सर्व नागरिकांना बंधनकारक असते. मात्र गणेश रामदासी यांच्यासारखे बेजबाबदार अधिकारी स्वत:ला कायदे मंडळापेक्षाही सर्वश्रेष्ठ समजू लागले आहेत, असे यावरुन दिसून येते. 

कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल माध्यमांनी अतिशय दर्जेदार कामगिरी केली असून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम न थकता, कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता केले आहे. महाराष्ट्र शासन वगळता इतर राज्यांमध्ये डिजिटल मीडिया पत्रकारांना इतर मीडियाच्या पत्रकारांप्रमाणेच सर्व सुविधा मिळतात. शासकीय जाहिराती, अधिस्विकृती सारखे लाभ डिजिटल मीडिया पत्रकारांना दिले जातात. 

महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण डिजिटल मीडिया पत्रकारितेकडे उज्ज्वल भविष्याची आस लावून बसलेले आहेत. जीवाची पर्वा न करता अनेक प्रसंगी डिजिटल मीडिया पत्रकारांनी बहुमोल काम केले आहे. डिजिटल मीडिया पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील अनेक गुणवंत पत्रकारांनी आर्थिक गुंतवणूक करुन पत्रकारितेचा नवीन आयाम, आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे. गणेश रामदासी यांनी “डिजिटल मीडिया अनधिकृत आहे” असे वक्‍तव्य करुन अनेक युवा पत्रकारांच्या मनामध्ये नैराश्य व नकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

महामहीम राष्ट्रपती यांच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये वक्‍तव्य करणारे अधिकारी गणेश रामदासी यांची याप्रकरणी विभागीय चौकशी, निलंबन हे कार्यालयीन सोपस्कर न करता त्यांना सेवेतून थेट बडतर्फ करावे अशी मागणी इंदापूर वेब पोर्टल व युट्यूब चॅनेल च्या संपादक, पत्रकारांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते