मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर नगर परिषदेने शहरात विविध ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड तसेच ई बाइक साठी संप पंप हाऊस लगत मोफत चार्जिंग स्टेशन शंभर फुटी रोड लगत निर्माण केलेली बायोडायव्हर्सिटी, भार्गवराम बगीच्या भरव्यावर नव्याने 5000 वृक्षांची केलेली लागवड, टाऊन हॉल पाठीमागील बाजूस निर्माण केलेले अटल आनंद घनवन, टेलिफोन ऑफिस ते भारती टॉवर याठिकाणी लावलेले वृक्ष, संविधान चौक ते तापी चौक शंभर फुटी रोड दुतर्फा बाजूस केलेला सायकल ट्रॅक व इतर कामांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पोर्टल वरती महाराष्ट्र राज्यामध्ये या आठवड्यात इंदापूर नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याची दखल शासनाने घेऊन इंदापूर नगर परिषदेचा सन्मान केला 
याबाबत शासनाच्या फेसबुक पोर्टल वरील पोस्ट पाहून पाणी फाउंडेशन चे संस्थापक सदस्य ज्यांनी आजपर्यंत गेली वीस ते बावीस वर्ष समाजासाठी सर्वस्व वाहिले आहे असे सन्माननीय डॉक्टर अविनाश पोळ यांनी त्यांचे कामानिमित्त  बाहेर गावी जाताना इंदापूर नगरपरिषदेने केलेल्या कामाची दखल घेण्यासाठी वरील ठिकाणी आवर्जून भेटी देऊन माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा, मुख्यअधिकारी माननीय डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केलेल्या नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 
अटल आनंद घनवन येथे भेटीदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की शहरांमध्ये आपण मोठ मोठ्या इमारतीच्या भिंती उभ्या करण्यापेक्षा मोठमोठी झाडे उभी केली पाहिजेत इंदापूर नगर परिषदेने अशाच प्रकारचे शहरात इतर ठिकाणी अशीच घनवने तयार करून जैवविविधता जपली पाहिजे तुमच्या या कार्याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर नगरपरिषदेने  घेऊन त्यांनीसुद्धा असे वने निर्माण केले पाहिजेत.इंदापूर नगरपरिषदेचा त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी आपला जीव ओतून अशा प्रकारची कामे केलेली आहेत हे यातून जाणवत आहे असे गौरव उद्गार काढून सर्वांचे अभिनंदन केले.
 इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्र येथे आवर्जून भेट दिली त्या दरम्यान त्यांनी तेथील उपक्रम ,विविध प्रकारच्या लावलेल्या आयुर्वेदिक वनस्पती व इतर वनस्पतीची माहिती घेतली कचर्‍यात आलेल्या टाकाऊ वस्तु पासून त्याचा खुबीने पुनर्वापर केलेल्या वस्तूंची त्यांना भुरळ पडली. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की येथे फिरताना कुठल्याही प्रकारचा दुर्गंधी चा वास आला नाही किंवा माशाचा प्रादुर्भाव जाणवला नाही शहरातील नागरिकांनी येथे आवर्जून भेट द्यावी .
जेणेकरून त्यांनी वेग वेगळ्या केलेल्या कचऱ्याचे येथे काय होते येथील कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात याची सुद्धा त्यांना जाणीव होऊन त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. येथील कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की कचरा या क्षेत्रामध्ये काम करणारे खऱ्या अर्थाने देशाचे सैनिक आहेत कारण देशात दोन प्रकारचे सैनिक आहेत एक बॉर्डरवर लढणारा सैनिक तो बाहेरच्यांना आत येऊ देत नाही त्यामुळे आपण आपला देश सुरक्षित आहे.. तर दुसरा सैनिक जो गाव पातळीवर गावात अशा वेगवेगळ्या उपक्रमातील कार्य करत आहेत ज्याच्यामुळे गाव स्वच्छ राहते आणि रोगराई न पसरण्यास  मदत होते खऱ्या अर्थाने अशा काम करणाऱ्या सैनिकांना माझा सॅल्यूट. अशाच प्रकारे उत्तरोत्तर आपल्या शहराची अशीच प्रगती होवो आपल्या हातून असेच कार्य घडो आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी संप पंप हाऊस येथील लावलेल्या वृक्षाबद्दल श्री गजानन पुंडे यांनी माहिती दिली आणि आणि या ठिकाणी देव चाफ्याच्या आलेल्या फुलांचा पुष्पगुच्छ नगराध्यक्ष सौ अंकिता ताई यांच्या हस्ते देऊन माननीय डॉक्टर अविनाश पोळ यांना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता ताई शहा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शेठ शहा, नगरसेवक व इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.भरतशेठ शहा आस्थापना प्रमुख श्री.गजानन पुंडे, अल्ताफ पठाण, विलास चव्हाण, शहर समन्वयक शिवराज परमार, सहाय्यक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ व श्री अशोक चिंचकर, दीपक शिंदे हे उपस्थित होते,  तत्पूर्वी वरील सर्व उपक्रमाबाबत अल्ताफ पठाण यांनी डॉ.अविनाश पोळ यांना माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...