मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

आम्ही  'बि' घडलो आणि पत्रकारिते समोरील आव्हाने हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न 

इंदापूर:२६ जानेवारी च्या दिवशी पत्रकारांसाठी  विशेष कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुता याचे दर्शन महेश स्वामी यांनी सर्वांना घडवले, विषय  आम्ही 'बि' घडलो... आणि पत्रकारिते समोरील आव्हाने या विषयावर प्रत्येक पत्रकारांना आपापले विचार व्यक्त करण्याची नामी संधी दिली,
हा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार महेश स्वामी यांच्या संकल्पनेतून  राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे साजरा करण्यात आला,यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर म्हणाले की, 
लोक आता प्रिंट माध्यमांकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचं दिसून येत  आहे.माध्यमांमधले हे बदल सांगत असताना आता पत्रकारितेतलं भविष्य हे डिजिटल असल्याचंही म्हणावे लागत आहे.सुरुवातीला प्रिंट माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक मीडिया आव्हान होतं. 

पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आगमनानंतर वर्तमानपत्रांनी स्वत: बदल पण आता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया वेगानं वाढत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे छापून वर्तमानपत्रं विकणं कठीण  झालं आहे.ग्रामीण भागात युट्यूब चॅनेल्स  झाले आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुर बदलण्याचं आव्हान पत्रकारांसमोर आहे. पत्रकारितेचे स्वरुप बदलत असलं तरी  पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम रहाणार आहे, 

म्हणून पत्रकार बांधवांनी आपल्या पत्रकारितेचे पावित्र्य जपावे. आपल्या स्वार्थासाठी सत्तेवर असलेले राजकारणी लोकांना पत्रकार निसंग करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. यासाठी महाभारतातील वीर पुरुष अर्जुनाची जितकी श्रद्धा आणि विश्वास आपल्या धनुर्विद्येवर होता त्याच न्यायाने पत्रकारांनी आपली पत्रकारिता जपली पाहिजे,पत्रकारीता म्हणजे जगण्याचे साधन नाही.ते आपण समाजासाठी हाथी घेतलेले वृत आहे,  असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर  यांनी केले लोकशाहीतील पत्रकारिता ही लोकशाहीची जीवनवाहिनी आहे. समाजातील सर्वच घटकांना पत्रकारिता तारण्याचे काम करते. 

प्रशासनात काम करताना राजकारण्यांनाही असंख्य अडचणी येतात, प्रशासनातील नियम लोककल्याणाच्या जेंव्हा आड येतात त्यावेळेस फक्त पत्रकारिताच राजकारण्यांना तारू शकते. यामुळे भल्या भल्या राजकारण्यांची झोप उडविणारी पत्रकरिता याच भल्याभल्यांना तारक ठरते. असे मत जेष्ठ पत्रकार विकास शहा  यांनी व्यक्त केले. 

पत्रकारांना दूर ठेवू इच्छिणार्‍या राजकारण्यांना ही गोष्ट अशक्यप्राय असून प्रशासनात काम करताना ज्यावेळी राजकारण्यांना अडचणी येतात त्यावेळेस लोककल्याणा चा ध्यास घेतलेले पत्रकार मित्र राजकारण्यांना तारुन नेतात असे मत अॅड राहुल मखरे यांनी  व्यक्त केले. कोरोना काळातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करणारे पत्रकार बांधव ऑनदस्पाॅट कामं करतानापहायला मिळाले लॉकडाऊनमुळे सारेच घरात टीव्ही समोर बसून बातम्या पहायचे पत्रकार मात्र जीव धोक्यात घालून काम करारायचे आसे मत जेष्ठ पत्रकार मधुकर गलांडे यांनी व्यक्त केले, पत्रकारीता करताना स्वाभिमान घाण ठेवू नका, अभिमानाने पत्रकारीता करा,

आसे मत सलिम शेख यांनी व्यक्त केले, या वेळी जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर,विकास शहा,सलिम शेख,व बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव अॅड राहुल मखरे,गटनेते व नगरसेवक कैलास कदम  व गफुरभाई सय्यद,  रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे,रिपब्लिकन पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, 
जेष्ठ पत्रकार मधुकर गलांडे, काकासाहेब मांढरे, निलकंठ मोहिते ,सुरेश जकाते, कैलास भाऊ पवार, धनंजय कळमकर,सुरेश मिसाळ, देवीदास राखुंडे,राहुल ढवळे,दिपक खिलारे,संतोष भोसले, संतोष दहीदुले, श्रेयस नलवडे, सागर शिंदे,सिध्दार्थ मखरे, सत्यजित रणवरे,जितेंद्र जाधव,तात्याराम पवार,शिवकुमार गुणवरे,जावेद शेख, हमिदभाई आतार, उपस्थित होते,
हा कार्यक्रम स्नेहभोजनाने खेळीमेळीच्या वातावरणात पारपडला या कार्यक्रम चे सुत्रसंचालन व प्रास्ताविक महेश स्वामी यांनी केले तर आभार सागर शिंदे यांनी मानले, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...