मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

   इंदापूर: महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या राज्यामध्ये माझी वसुंधरा हे अभियान सुरु असून या उपक्रमांतर्गत इंदापूर शहराच्या पर्यावरणीय संवर्धनाच्या वाढीसाठी इंदापूर नगरपरिषदेने नागरिकासाठी उत्तरायन सप्ताह स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांचा इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले 17 ते 23 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती.
   माझी वसुंधरा अभियानांतर्गत उपक्रमांमध्ये पर्यावरणीय जनजागृती तसेच पर्यावरण संवर्धन यावर लक्ष केंद्रित करून लोकसहभागातून पर्यावरणातील शाश्वत विकास प्रति प्रयत्न केला आहे. या उत्तरायन सप्ताहात भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या पंच महातत्वावर आधारित घटकांचे पर्यावरणीय महत्त्व दर्शवणारी कलाकृती सादरीकरण करणे आवश्यक होते.

 या स्पर्धेत प्रथम क्रमांक पाच हजार, दुतीय क्रमांक तीन हजार आणि तृतीय क्रमांक पाच दोन हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत एका छोटेखानी कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा.सौ. अंकिता शहा तसेच मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,उपाध्यक्ष मा.श्री धनंजय पाटील, व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
  विजेत्यांचे नाव घटका नुसार पृथ्वी - १ ) नागेश राम केंगार २) दर्शन धनंजय दळवी ३ ) विनय अशोक कचरे,  वायू -१ ) वैष्णव प्रमोद धांगेकर २ ) ऐश्वर्या सुरेश शिंदे ३ ) श्रद्धा सौदागर गोडसे, जल -१ ) हसिबा शमशेर शिकलकर २ ) सागर शिंदे ३ ) राजेस्वी जाधव, अग्नी -१ ) अंकित दीपक चव्हाण २ ) स्नेहल संतोष साबळे ३ ) बाबासाहेब रामचंद्र भोंग
 यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक व इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरतशेठ शहा, गटनेते कैलास कदम, नगरसेविका सुवर्णा मुखरे, मीना मोमीन, राजश्री मखरे, हेमलता मालुंजकर विशाल बोंद्रे, महादेव सोमवंशी, जावेद शेख, हमीद आत्तार, धीरज शहा ,सचिन जामदार, इंदापूर अर्बन बँकेचे चे संचालक दादासाहेब  पिसे, सागर गाणबोटे, सायरा आत्तार, गुड्डू मोमीन, नितीन मखरे, ललेंद्र शिंदे उपस्थित होते.
   सूत्रसंचालन श्रद्धा वळवडे यांनी केले. वर्षा क्षीरसागर यांनी आभार मानले. तत्पूर्वी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येऊन नगरपरिषद कार्यालयासमोरील प्रांगणात माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांना वसुंधरेची शपथ देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते