मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कर्मयोगी शंकरराव पाटील सह साखर कारखान्याच्या सेंद्रिय खताची किमया न्यारी,१०३टन उत्पन्न शेतक-यां घेतले एकरी..

इंदापूर तालुक्यातील कालठण नं.२ येथील एक एकरात १०३ टन ऊसाचे उच्चांकी उत्पादन
इंदापूर तालुक्यातील कालठण नं.२ येथील श्री.गोकुळ गोविंद मेंगडे या
शेतकऱ्याने एक एकरामध्ये १०३.०७८ मे.टन इतका ऊस उत्पादीत करून ऊस शेतीत
विक्रम केला आहे. मेंगडे यांना गुंठयाला २ टन ५७६ किलो इतका उतारा मिळालेला
आहे. त्यासाठी त्यांनी फक्त रू.२३,९००/- इतका खर्च केला आहे.


यासाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील सह.साखर कारखान्याचे सेंद्रिय व जैविक
खत एकात्मीक खत व्यवस्थापनाअंतर्गत वापर करून विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे.
एक एकर क्षेत्रासाठी त्यांनी कर्मयोगी सेंद्रिय खत एकरी ३५ बॅग अँसिटोबॅक्टर व गोमुत्र
७ वेळा फवारणी, ॲझोटोबॅक्टर, पी.एस.बी., के.एम.बी. व जिवामृत ४ वेळा आळवणी
व शेणखत १० बैलगाडी असे खत व्यवस्थापन केले आहे.

खताविषयी माहिती देताना मेंगडे 


कारखान्याची सेंद्रिय जैविक खते वापरून जास्त उत्पादन घेतल्यामुळे तसेच
कार्यक्षेत्रातील इतर सर्व ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शनपर काम केल्यामुळे माजी
मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा भोसले यांच्या हस्ते मेंगडे
यांचा कारखाना सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सर्व
संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बी.जी.सुतार व सर्व अधिकारी उपस्थित होते.
कारखाना कार्यक्षेत्रातील माती नमुन्याच्या पृथ्थकरण अहवालानुसार कार्यक्षेत्रामधील
जमिनीतील सेंद्रिय कर्ब स्फुरद, झिंक, फेरस या अन्नदुव्याचे प्रमाण कमी झालेले असून
जमिनीची क्षारता, पी.एच. वाढला आहे. यासाठी उपाययोजना म्हणून सर्व मुख्य व
सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त असे कर्मयोगी सेंद्रिय खत कारखान्याने तयार केलेले आहे.
ऊस उत्पादक सभासदांनी मेंगडे यांचा आदर्श डोळयासमोर ठेवुन सेंद्रिय, जैविक व जिवामृत
इत्यादीचा संयुक्तीकपणे वापर करून कमी खर्चामध्ये व जमिनीची सुपिकता अबाधित
ठेवून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्यावे. असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन
पाटील व उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी यावेळी केले.
श्री.  मेंगडे यांनी त्यांचाच मागील सिझन २०१७-१८ मधील ९०.९८१ मे.टन
उच्चांक १०३.०७८ मे.टन उत्पादन घेवून मोडीत काढता आहे. तसेच यापुढे सभासदांनी
सेंद्रीय खते जास्त वापरावीत.आसे आवाहन चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करूनपार पडला आहे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कर्तव्य दक्ष, कार्यकारी संचालक बाजीराव.जी.सुतार यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक शरदराव काळे यांनी केले, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते