मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर : प्रतिनिधी 

महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना म्हणजे दुधातील साखर आहे, असे गौरवोद्गार बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.

(दि. २६ ) रोजी इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात महाविकास आघाडीचे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. 
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे,शिवसेनेचे शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख वसंतराव आरडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाने सरकार स्थापन केले. सरकार नऊ दिवस, 9 आठवडे, नऊ महिने चालेल अशी टीका टीकाकारांनी केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. असे सांगून खासदार सुळे पुढे म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्य सरकारने अतिशय चांगली अंमलबजावणी केली. संपूर्ण देशात सर्वात जास्त कोरोनाची रुग्णसंख्या होती. कारण यामध्ये कसलीही लपावाछपीवी केली नव्हती. महाराष्ट्र सरकारच्या कामाची नोंद परदेशातही घेण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना पक्ष म्हणजे दुधातील साखर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'हे अभियान सुरु केले. पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
     
विरोधी पक्षाचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सरकार कधी पडणार याचे स्वप्न त्यांना पडतात. मात्र सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. आगामी काळात हे सरकार असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदार संघातील उमेदवारांसाठी एक एक मत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद मतदार संघ निहाय नियोजन करुन मतदान केंद्रावर मतदान आणावे. महाविकास आघाडीचे सर्व पक्षाला बरोबर घेऊन हे नियोजन करावे. बावडा गटांमध्ये सर्वात जास्त मतदान असल्याने नियोजन करुन मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
        
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार संघातील उमेदवारांसाठी मतदान घडवून आणायचे आहे. इंदापूर शहर, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानुसार मतदारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान इंदापूर तालुक्यात आहे. कार्यकर्त्यांनी गांभीर्याने या निवडणुकीचे काम केले पाहिजे असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी केले.

 खासदारांनी केले राज्यमंत्र्याचे कौतुक... खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणामध्ये पदवीधर बेरोजगार युवकांसाठी काहीही आश्वासन अगर आवाहन झाले नाही. उलटपक्षी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे तोंड भरुन कौतुक झाले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दत्तात्रय भरणे राज्यमंत्री असल्यामुळे मला आता काम उरले नाही. एक राज्यमंत्री असतात की, त्यांची कधीही तक्रार नसते. मंत्रालय दत्तात्रय भरणे यांची कार्यालय सातव्या मजल्यावर आहे.त्याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांचेही कार्यालय आहे. दोघांच्या कार्यालयाला टेरेस आहे. त्याठिकाणी बसून चहा पीत मुंबईचा समुद्र पाहायचा. दत्तात्रय भरणे यांचा मंत्रालयात वावर एखाद्या कॅबिनेट मंत्र्यासारखा असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...