मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर  तालुका प्रतिनिधी 

स्वराज्याचे सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांची ३७५ वी जयंती इस्लामपूर ता. माळशिरस येथील श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या वतीने ( दि.१६ ) रोजी साजरी करण्यात आली.
 
यावेळी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील अनेक युवक कार्यकर्ते, त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, सोलापूर ,सातारा, पुणे अशा अनेक भागातून घोरपडे यांचे वारसदार व अनेक मान्यवर या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित होते अशी माहिती राजेंद्र दुर्योधन घोरपडे यांनी दिली.
 
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या विचारात बोलताना म्हटले की,राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज,  संभाजी महाराज, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गड, किल्ल्यांप्रमाणेच अनेक स्वराज्यरक्षक वीरांच्या समाधीस्थळांना सुद्धा पर्यटनाचा दर्जा द्यावा. हा ऐतिहासिक ठेवा जतन ठेवण्यासाठी राज्यसरकारने निधी उपलब्ध करुन देण्यात अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. 
 यावेळी संजय घोरपडे (सचिव) श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, रणधीर घोरपडे बहादुरवाडीकर,गिरीश घोरपडे मंगळापुर, दिलीप भोसले लोणी काळभोर (पुणे ), प्रशांत घोरपडे, तुकाराम घोरपडे हासेवाडी( सातारा ), राजेंद्र दुर्योधन घोरपडे (ता. इंदापूर ,घोरपडवाडी ), सचिन घोरपडे, तुकाराम घोरपडे, अतुल घोरपडे, प्रभाकर घोरपडे, सोमनाथ घोरपडे, संताजी उत्तमराव घोरपडे, सुरेश घोरपडे,  नितीन घोरपडे, दत्तात्रय घोरपडे, बाबुराव घोरपडे, गणेश घोरपडे  , राजेंद्र किसनराव घोरपडे, चेतन घोरपडे, काकासाहेब घोरपडे, मधुकर घोरपडे, किसन भांगे, संग्राम रणवरे, भरत माने, भानुदास पवार, शिवाजी पवार, अर्जुन पवार,  प्रताप पवार, दत्तात्रय जाधव, सुधीर पवार, सुभाष काळे, जे.डी. माने, गणेश महामुने, आनंद शेंडगे, भाऊ माने आदी उपस्थित होते.
----------------------------------


 शत्रूच्या छावणीचे कळस कापून आणणारे आणि शत्रूच्या सैन्यातील घोड्यांना पाण्यात दिसणाऱ्या या संताजीराजे समाधी स्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे आणि येणाऱ्या  भावी पिढीला , युवकांना , छत्रपती शिवाजी महाराज ,  संभाजी महाराज , तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे,  संताजीराजे  अनेक शूर वीरांचा इतिहास शैक्षणिक कार्यक्रमात , अभ्यासक्रमात , आचरणात , राजकारणात  , सामाजिक अनेक क्षेत्रात आत्मसात करण्यासाठी व  उपयोगी पडावा म्हणून महाराष्ट्र सरकारने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गड-किल्ल्यांचा अशा  शूरवीरांच्या समाधी स्थळांचा त्यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा असे आम्ही सर्व घोरपडे प्रतिष्ठानचे पदाधिकारी मागणी करत आहोत.  येणाऱ्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष  केले गेलं तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल. या शूरवीरांच्या समाधीस्थळांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे  व विकास निधी विशेष करून उपलब्ध करावा.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...