मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

आमच्या संस्थेचे उच्च  न्यायालयात  काम पाहणारे अॅड. बाळासाहेब देशमुख यांनी  भ्रमणध्वनीवरून दिली माहिती-संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे
इंदापूर (प्रतिनिधी दि.१२ नोव्हेंबर २०२०)मुंबई  उच्च न्यायालयात इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे      अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आश्रम शाळांचे  थकित परिपोषणाचे अनुदान त्वरित मिळावे  यासाठी याचिका दाखल केली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खरमरीत भाषेत खडसावले आहे.आणि दोनच दिवसात आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान दोनच दिवसात देण्याचे आदेश दिले अशी माहिती भ्रमणध्वनीवरून आमच्या संस्थेचे उच्च न्यायालयात काम पाहणारे अॅड. बाळासाहेब देशमुख यांनी दिली. विद्यार्थ्यांचे जेवणाचे पैशांबाबत अशा पद्धतीने सरकार वागत असेल तर आम्हाला प्रधान सचिवांना न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश द्यावे लागतील असेही उच्च न्यायालयाने शासनास बजावले असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून अॅड.बाळासाहेब देशमुख यांनी दिल्याचे पत्रकारांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांनी म्हटले आहे.         सदरचे थकीत अनुदान हे मार्च २०२० पूर्वीच देणे जरूर असताना गोरगरीब विद्यार्थ्यांचे अनुदान रखडून शासनाने काय साध्य केले ?  गोरगरीब  VJNT च्या मुला- मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव तर प्रस्तपितांचा आणि शासन कर्त्यांचा नाही ना? असा प्रश्न संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. महाराष्ट्रातील व इंदापूर तालुक्यात प्रस्थापितांच्या आश्रम शाळा आहेत. परंतु अनुदान संदर्भात शासना विरोधात एका ही संस्था प्रमुखाने तोंड देखील उघडले नसल्याचे मखरे यांनी पत्रकार नमूद केले आहे. मागील सरकारने विद्यार्थ्यांचे रेशनिंगचे धान्य देण्याचे बंद केले होते.परंतु मी मागणी केल्यामुळे खुद्द आदरणीय शरदचंद्रजी  पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घालून आश्रमशाळेंच्या  तीन लाख निवासी विद्यार्थ्यांचा रेशनिंगच्या अन्न धान्याचा  प्रश्न मार्गी लावला आहे असे मखरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.         
     परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमच्या बाजूने आमचे वकील अॅड.बाळासाहेब देशमुख यांनी मा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश साहेब यांचे समोर बाजू मांडताना प्रलंबित परिपोषण आहार अनुदान त्वरित मिळावे ही बाब निदर्शनास आणून दिली होती. आश्रमशाळेकडील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे व तसेच या पूर्वी निवेदनात नमूद केलेल्या मागणीनुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांचे वरती  जो पर्यंत कारवाई होत नाही. तो पर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार आहे,असे शेवटी संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांनी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...