मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

आमच्या संस्थेचे उच्च  न्यायालयात  काम पाहणारे अॅड. बाळासाहेब देशमुख यांनी  भ्रमणध्वनीवरून दिली माहिती-संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे
इंदापूर (प्रतिनिधी दि.१२ नोव्हेंबर २०२०)मुंबई  उच्च न्यायालयात इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे      अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आश्रम शाळांचे  थकित परिपोषणाचे अनुदान त्वरित मिळावे  यासाठी याचिका दाखल केली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खरमरीत भाषेत खडसावले आहे.आणि दोनच दिवसात आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान दोनच दिवसात देण्याचे आदेश दिले अशी माहिती भ्रमणध्वनीवरून आमच्या संस्थेचे उच्च न्यायालयात काम पाहणारे अॅड. बाळासाहेब देशमुख यांनी दिली. विद्यार्थ्यांचे जेवणाचे पैशांबाबत अशा पद्धतीने सरकार वागत असेल तर आम्हाला प्रधान सचिवांना न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश द्यावे लागतील असेही उच्च न्यायालयाने शासनास बजावले असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून अॅड.बाळासाहेब देशमुख यांनी दिल्याचे पत्रकारांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांनी म्हटले आहे.         सदरचे थकीत अनुदान हे मार्च २०२० पूर्वीच देणे जरूर असताना गोरगरीब विद्यार्थ्यांचे अनुदान रखडून शासनाने काय साध्य केले ?  गोरगरीब  VJNT च्या मुला- मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव तर प्रस्तपितांचा आणि शासन कर्त्यांचा नाही ना? असा प्रश्न संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. महाराष्ट्रातील व इंदापूर तालुक्यात प्रस्थापितांच्या आश्रम शाळा आहेत. परंतु अनुदान संदर्भात शासना विरोधात एका ही संस्था प्रमुखाने तोंड देखील उघडले नसल्याचे मखरे यांनी पत्रकार नमूद केले आहे. मागील सरकारने विद्यार्थ्यांचे रेशनिंगचे धान्य देण्याचे बंद केले होते.परंतु मी मागणी केल्यामुळे खुद्द आदरणीय शरदचंद्रजी  पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घालून आश्रमशाळेंच्या  तीन लाख निवासी विद्यार्थ्यांचा रेशनिंगच्या अन्न धान्याचा  प्रश्न मार्गी लावला आहे असे मखरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.         
     परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमच्या बाजूने आमचे वकील अॅड.बाळासाहेब देशमुख यांनी मा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश साहेब यांचे समोर बाजू मांडताना प्रलंबित परिपोषण आहार अनुदान त्वरित मिळावे ही बाब निदर्शनास आणून दिली होती. आश्रमशाळेकडील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे व तसेच या पूर्वी निवेदनात नमूद केलेल्या मागणीनुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांचे वरती  जो पर्यंत कारवाई होत नाही. तो पर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार आहे,असे शेवटी संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांनी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते