मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

        इंदापुर; टोल कर्मचारी व कंत्राटी कंपनीच्या विरोधातील 20 तारखेला चालू झालेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या मद्यस्थिनी आज अखेर मिटले.
       सविस्तर बातमी अशी की कर्मचाऱ्यांचे कंत्राट घेणारी नवीन कंपनी g & g empire india services pvt. Ldt मागील दहा दिवस पूर्वी कारभार स्वीकारला . त्या मधील जुने नव लोकांना कंपनीने कुठलीही नोटीस कुठलेही कारण न देता नवीन करार केला नाही व त्यांना कामावर रुजू होण्यास मज्जाव केला. कामावर परत घेण्यासाठी सर्व कर्मचारी इंदापूर तहसील कार्यालय समोर आंदोलनाला बसले होते. 
     काल पहिल्या दिवशी अॅड.  राहुल माखरे, अनिल पवार , कैलास कदम,शकील सय्यद, प्रकाश पवार,सुनील कांबळे, समद भाई व बऱ्याच जणांनी आंदोलनासभेट देऊन पाठिंबा दिला . ऍड राहुल माखरे यांनी देखील टोल कंपनीशी संपर्क साधला .
          इंदापूर तालुका कॉग्रेस चे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी या आंदोलनाला भेट देत त्यांच्या सर्व सहकारी पध्दधिकाऱ्या सहित आंदोलकां बरोबरीने आंदोलनात ठिया मांडला . त्यांनी टोल प्रशासना बरोबर संपर्क साधला तसेच नवीन कंपनीच्या मालकांबरोबर सातत्याने संपर्क साधून दहा ते बारा वर्ष कामावर असलेले कामगारांवरील झालेला अन्यायाची कल्पना दिली व कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास भाग पाडले .
         आज आंदोलनाच्या जागीच सहा कर्मचाऱ्यांची जोइनिंग लेटर देण्यात आली व राहिलेल्या 3 कर्मचारांचा प्रश्नही लवकर मार्गी लाव असे आश्वासन दिले. 
    या प्रसंगी स्वप्नील सावंत म्हणाले की सर्व सामान्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष कायमच राहिला असून येणार काळात देखील तालुक्यातील सर्व सामान्यांच्या प्रश्नसाठी काम करत राहील .
      या वेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष स्वप्निल सावंत कार्याध्यक्ष काकासो देवकर, उपाध्यक्ष  बिभीषण लोखंडे , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जकिर भाई काझी , काँग्रेस शहर अध्यक्ष तानाजी भोंग , शहर कार्याध्यक्ष चमन भाई बागवान , निवास शेळके, तुषार चिंचकर, चेतन कोरटकर, संतोष शेंडे , उत्तम फाळके , सुरेश लोखंडे , मिलिंद साबळे आदी उपस्तीत होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...