मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज


इंदापूर:प्रतिनिधी दि. 25/10/2020
                 इंदापूर:तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती एकाच वेळी निर्माण झाल्याने  शेतीपिकांचे व घरांचे राज्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. मात्र‌ सध्या नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे केले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित  नये, त्याकरिता शासनाने नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व‌ घरांचे सरसकट पंचनामे पुर्ण करावेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) केली आहे.
                  ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. 14 व 15 ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन निरा व भीमा नदीला महापूर आला. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली. तसेच फळबागा व ऊस पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्याचबरोबर गावोगावच्या अनेक घरांची पुरामुळे व अतिवृष्टीने हानी झाली आहे. सध्या मात्र नुकसान झालेली खरीप पिके, ऊस , फळबागा तसेच घरांचे कालबाह्य नियम पुढे करून अनेक ठिकाणी सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणे पासून अनेक शेतकरी व नागरिक वंचित राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
           इंदापूर तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित राहणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. तात्काळ सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. आम्ही सत्तेवर असताना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकरी वर्गाला वेळोवेळी मोठी आर्थिक मदत केली आहे, याचा अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे, असेही यावेळी पाटील यांनी नमूद केले.
          ‌शासनाने बागायती पिकासाठी एकरी रु. ४ हजार व फळबागांसाठी 10 हजार एवढी तुटपुंजी मदत जाहीर केले आहे. सदरची मदत देतानाही नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे केले जात नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संगितले.
_______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...