मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर:प्रतिनिधी 
          इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. 14 व 15 ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले तरीही शासनाने आपत्तीग्रस्तांना कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. त्यामुळे शासनाने विलंब न लावता शेतक-यांना व पुरग्रस्तांना  25 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 21) इंदापूर येथे केली.
               इंदापूर तालुक्यात चालु पावसाळ्यात  आजपर्यंत विक्रमी 275 टक्के (एकुण 1450 मी.मी.) पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली आहेत. फळबागा व ऊस पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे कधी नव्हे असा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे तातडीची मदत म्हणून शेतक-यांना आता  तात्काळ 25 हजार रू. प्रति हेक्टरी याप्रमाणे  आर्थिक मदत शासनाने करावी. त्यानंतर पिकांचे पंचनामे पुर्ण झालेवर फळबांगांना व ऊस पिकांना प्रति हेक्टरी रू. 50 हजार निकषाप्रमाणे उर्वरित देय रक्कम रू.25 हजारची आर्थिक मदत  शेतकऱ्यांना द्यावी, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमुद केले. 
      ते पुढे म्हणाले, नीरा व भिमा नदीला पुर आल्याने तसेच गावोगावच्या ओढयांचे रूपांतर नदीत झाल्याने अनेक घरांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे अशा पुरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रू. 25 हजाराची मदत द्यावी. घरांचे पंचनामे झाल्यानंतर कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे नुकसानीच्या प्रमाणात रू. 1 लाख, रू. 2 लाख याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी. गावोगावची तसेच इंदापूर शहरातील दुकाने तसेच हॉस्पिटल्समधील उपकरणे यांचे नुकसान झाल्याने त्यांनाही आर्थिक सहाय्य करण्यात यावे.शासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, एकही शेतकरी अथवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहू नये.
      तसेच नीरा व भिमा नदीवरील बहुतेक बंधा-यांचे पुराने दोन्ही बाजूकडील भराव वाहून जाणे, ढापे वाकडे होणे, भिंतींना चिरा जाणे आदी प्रकारचे नुकसान झाले आहे. दि.15 ऑक्टो.पासून बंधा-यांमध्ये पाणी अडविले जाते. त्यामुळे हानी झालेल्या बंधा-यांची तात्काळ दुरूस्ती करून पुर्ण क्षमतेने पाणी अडविणेत यावे. भीमा व नीरा नदीचे पात्र डिसेंबर महिन्यात कोरडे पडते. जर सध्या पाणी अडविले नाही तर मात्र निरा व भिमा नदी काठच्या शेतकऱ्यांची पिके 15 जानेवारीपासून पाण्याअभावी जळुन जाऊन, शेतकरी उध्वस्त होईल, असा स्पष्ट  इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
         सध्याच्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांची  खरीप व इतर पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे चालू रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतक-यांना प्रति हेक्टरी रू.15 हजार रूपयांचे अनुदान शासनाने देण्याची गरज आहे, असे मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
      राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दि. 19 रोजी इंदापूर तालुक्याची पुर परिस्थितीची पाहणी केली. ते केंद्र शासनाकडून शेतक-यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
      इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे बांधकाम खात्याचे मंत्री आहेत, असे असताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील गावोगावच्या  रस्त्यांची वाट लागली आहे. तसेच अडचणीतील शेतकरी व नागरीकांना शासनाची तात्काळ मदत मिळवून देणेचे काम हे लोकप्रतिनीधीचे असते, मात्र तालुक्याचे लोकप्रतिनीधी यामध्ये निष्क्रिय व अपयशी ठरले आहेत, अशी टिका यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. 
**************************************
सोलापुरात चेक वाटप, मग इंदापूरात का नाही? - हर्षवर्धन पाटील. -----------------------------------------------इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने चेकचे वाटप करण्यात आले.आपले लोकप्रतिनिधी सोलापूर येथे शासनाची तात्काळ मदत म्हणून जनतेला चेक वाटतात, मात्र इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत. तसेच सोलापूरच्या तुलनेत इंदापुरात जास्त नुकसान झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणे गरजेचे होते, असे स्पष्ट मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले._____________________________
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...