मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूरः तालुक्यातील बेडसिंगे येथील विष्णू ज्योतिराम अवचर या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली त्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून गेले.
कोरोना चे भयानक संकट व  अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना व सामान्य जनतेच्या हाताला काम नसल्याने आणखीनच भले मोठे  संकट अवचर यांच्यासमोर उभे राहिले आहे,म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना,यावेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या नागरीकांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू चा आधार देण्याचा प्रयत्न केला.
ही घटना समझताच भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व भावी जिल्हा परिषद सदस्य  मा.अमोलराजे इंगळे यांनी अवचर कुटुंबाला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला,यावेळी बोलताना अवचर म्हणाले की आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेटून आम्हाला मदत दिली नाही, तलाठी यांनी येऊन पंचनामा केला आहे, परंतु आम्हाला तत्काळ मदतीची गरज आहे.
यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की आम्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून लागेल ती मदत करु,अवचर यांचे घर आगीत जाळून खाक झाले आहे,अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे,कोरोना मुळे सर्वत्र मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी या शेतक-याला नव्याने उभा राहण्यासाठी आपण बळ देऊ,    तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अवचर कुटुंबियांना मदत करावी अशी विनंती भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे यांनी केली.
इतर अनेक सामाजिक संघटनांनी व राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी अवचर यांच्या घराला मदतीचा हात द्यावा, व या कुटुंबाला नव्याने उभा राहण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे, आशी सर्वत्र चर्चा आहे. अमोलराजे इंगळे यांनी केलेली मदत त्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना लाख मोलाची आहे,यावर एक कविता आठवली  "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!"
यावेळी हरी जाधव, किरण यादव, सुधीर यादव, प्रवीण देवकर ,उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...