मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर :प्रतिनिधी दि.6/9/20
                शेतकरी कुटुंबातील अविनाश शिंदे हा युवक जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वोच्च परीक्षेमध्ये यश मिळवून जिल्हाधिकारी झाला आहे, याचा इंदापूर तालुक्यातील जनतेला अभिमान आहे.तसेच स्पर्धार्थी युवकांसाठी अविनाश शिंदे यांनी आदर्श घालून दिला आहे,असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले. 
           केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन 2019 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अविनाश संजीवन शिंदे (पवारवाडी) यांचा हर्षवर्धन पाटील इंदापूर येथे गुरुवारी (दि.3) सत्कार करण्यात आला.
                  प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अविनाश शिंदे यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांनी तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करावे,असे हर्षवर्धन  पाटील यांनी यावेळी सांगितले.अविनाश शिंदे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. या सत्कार प्रसंगी संजीवन शिंदे, राजेंद्र शिंदे,शांताराम वाकळे, शितल शिंदे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, गणेश घोरपडे, सुनील कणसे आदी उपस्थित होते.
 ********************************
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकार्‍यांना माझे व्याख्यान - हर्षवर्धन पाटील========================युपीएससी स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या देशातील जिल्हाधिकार्‍यांना मसूरी-डेहराडून (उत्तराखंड) येथे प्रशिक्षण दिले जाते. राज्याचा मी संसदीय कार्यमंत्री असताना माझा उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावर्षी मसुरी येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझे व्याख्यान ठेवण्यात आले होते. सदरच्या व्याख्यानाला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकाऱ्यांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याची आठवण या सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली._____________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...