मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन समारंभ संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
      कर्मयोगी भाऊंचे प्रतिमेस अभिवादन करून अभिष्टचिंतन कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रथम कारखान्याचे सर्व संचालक यांचे शुभहस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांनी मोठे भाऊ यांचे पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य चालू ठेवले आहे, त्यास ताईंचे पाठबळ आहे, तसेच कारखान्याचे कामकाजाबाबत माहिती दिली. कोरोनाबददल बोलताना त्यांनी जलनितीचा वापर करावा ज्यामुळे आपण या असाध्य रोगापासून दूर राहू शकतो असेही सांगितले.
      समारोप व आभार भाषणामध्ये कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे यांनी बोलताना श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांनी 20 वर्षे महाराष्टाच्या मंञीमंडळामध्ये उत्क़ष्टपणे काम केले. त्या कामास प्रशासनामध्ये तोड नाही. अधिकारी व प्रशासन यांचे समन्वनयाने त्यांनी आपले तालुक्यातील भरपूर कामे मार्गी लावली. अशी माहिती दिली.

      या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त कारखान्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यामध्ये कामगारांचे उस्फुर्त सहभागामुळे 101 बाटल्यांचे संकलन करणेत आले. कर्मयोगी कारखान्यावर मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो व मा.श्रीमती पदमाताई भोसले यांचे संकल्पनेतुन नुकतेच 6000 दिर्घायुषी झाडांचे लागवड करणेत आली असून या वाढदिवसानिमित्त आणखी 500 झाडांची लागवड आज करणेत आली. आणि “व्रुक्षमिञ” म्हणून लावलेल्या झाडांचे संगोपन करणेचा संकल्प सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. यानंतर कारखाना परिसरामध्ये स्वच्छता करणेत आली.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. समारोप कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे यांनी केले. सुञसंचालन व आभार कारखान्याचे कार्यालय अधीक्षक यांनी केले. या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. मानसिंग जगताप, श्री. यशवंत वाघ, श्री. अंबादास शिंगाडे, तसेच भावडी गावचे सरपंच श्री. देशमुख, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते