मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापुर:सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.
ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले त्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर 11 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते.
 या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. 
 इंदापूरमधील, राधिका सेवा संस्थेत विराजमान बाप्पाच्या  आरतीचा मान आनेक मान्यवरांना मिळाला होता त्यातच आजच्या आरतीचा मान, माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.प्रविण माने यांच्या शुभहस्ते करण्यात आली,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वत्र उत्सव साधेपणाने संपन्न होत असलेला पहायला मिळत असला, तरी विघ्नहर्ता नक्कीच आपल्यावर आलेले हे विघ्न  लवकरच दूर करेल. 
आरती करण्यात आलेल्या राधिका सेवा संस्थेचे माजी उपनगराध्यक्ष  अरविंद(तात्या) वाघ हे संस्थापक अध्यक्ष असून. गेले २० वर्ष ही संस्था समाजकार्यात तत्पर आहे.
या राधिका सेवा संस्थे मार्फत अनेक गोरगरीब व सर्व धर्मिय जनते पर्यंत नेहमीच मदत झाली आहे, कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरस मुळे लाॅकडाऊनच्या काळात, अनेक गरजूंना किटच्या माध्यमातून,मदतीचा हात पुढे करणारे राधिका सेवाभावी  संस्था,
 गणपती व दसरा चांगल्या प्रकारे साजरा करतात, घटस्थापणा च्या वेळी तुळजापुर येथून देवीची ज्योत घेऊन येणा-या मंडळांच्या लोकांना तुळजापुर पासून टेंभूर्णी पर्यंत काही कोणी देत नाही म्हणून त्यांना फराळ, चहा,केळी मसालेदुध   देऊन कार्यकर्त्यांचा(अध्यक्षांचा) हार,नारळ व शाॅल फेटा देऊन सन्मान केला जातो व फराळा चे वाटप करण्यात येते,हा फारच मोठा कार्यक्रम या संस्था,व परिवाराच्या वतीने करण्यात येतो, 
 इंदापुर विचार मंथन परिवार हा एक what's up ग्रुप आहे, नेहमीच जीवनावश्यक वस्तू व  सॅनिटायझर, मास्क लागेल ती मदत करण्याचे महाण कार्य यांच्या माध्यमातून नेहमीच घडले आहे, सलाम त्यांच्या कार्याला अशी सामान्य नागरिकातून बोलले जाते,
या विचारमंथन परिवाराच्या वतीने महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते, सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातात, त्या साठी (राधिका हाॅल) या सुसज्ज  वास्तुचा वापर केला जातो, या ठिकाणी सर्वच कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पाडला जातात,
 अनेक सभासद व मित्र परिवार वेळोवेळी मदत करतात,व अनेक सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे कार्यकरत आसतात,वरील संस्था व ग्रुप चा आदर्श महाराष्ट्र तील इतरांनी घ्यावा,आशी सर्वत्र चर्चा आहे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते