मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज

 इंदापुर :इंदापूरचा मोहरम सण हा पुणे जिल्हयात प्रसिद्ध आहे . या सणाला सर्वधर्मीय एकत्र येऊन मोठया प्रमाणात साजरा केला जातो .परंतु या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोहरम हा सण साध्या पध्दतीने घरगुती वातावरणात साजरा होत आहे,या सनाबद्दल माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार म्हणाले की 
पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम '  निर्माण करणारे 
 त्यांना या धर्माचा 'इल्म' झाला. त्यांना जेव्हा याचा
'इल्म' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण
काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली
नव्हती. त्या दिवसापासून यांना, "सल्लील्लाहू अलेह
वसल्लम हजरत पैगंबर नबी" अशी ओळख मिळाली.
सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता.
हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन शहिद 
घटना याच महिन्यात घडली 
हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन
व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स. च्या सातव्या शतकात
करबला मैदानात  शहिद झाले,अविष्कार करत ठार
मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात
विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात.
हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी त्यांना हुसेन यांच्या
नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज
थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी
सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकारअरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात.कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी हे
एका लाकडाला  'पंजा' लावून
चांगले वस्त्र बांधतात.अशी आख्यायिका आसल्याची माहिती हमीदभाई आतार व सहकार्यानी सांगितली,
        यावेळी इंदापूर शहरातील प्रसिध्द अशा सातपुडा भागातील शहरातील  मानाची दुसरी सवारी ही पद्माकर राऊत यांची आहे . सवारीचा पारंपारीक धार्मिक कार्यक्रम विधिवत पध्दतीने घरीच  प्रमुख पाच लोकात सोशल डिस्टनस ठेवून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला,यावेळी हमीदभाई आत्तार,प्रविण राऊत, सुरेश जाधव,आकाश क्षिरसागर , महेश माने हे उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...