मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण येथे - कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना- पुणे जिल्हा कार्यध्यक्ष कडून वृक्षारोपण  
-इंदापुर तालुक्यातील सुपुत्र - जिल्हाधिकारी *मा.राहुल जावीर साहेब IAS Collector ( On Working Assam Ghuvati ), शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष-राहुल शेठ गुंडेकर व कृषी क्षेत्रातील सर्व मित्र परिवार यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम काल दि.८ जुलै रोजी जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल , कालठण नं 1 येथे पार पडला - निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम पार पडला - 
*जिल्हाधिकारी मा.राहुल जावीर साहेबांनी या कार्यक्रमास आपले मनोगत व्यक्त करताना* - *अनुभवाने माणूस घडतो व तुम्ही स्वताला फसवाल पण आई-वडिलांना नाही कारण त्यांच्या सावली शिवाय जीवन घडत नाही व तसेच पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येऊन त्यांचे संगोपनाची करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सभोवताली असणारे सजीव आणि निर्जीवांचे विश्व म्हणजेच पर्यावरण आहे, पर्यावरण वाचविले तर माणूस वाचणार आहे*.असे मत व्यक्त केले.प्रा. जयश्री गटकुळ , यांनी मा. राहुल गुंडेकर यांची मराठा सेवा संघ इंदापुर शहर अध्यक्ष आणि  *सुमित कुलकर्णी* यांची
कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना-पुणे जिल्हाम्हणून निवड झल्याबद्दल सत्कार करण्यात आला, प्राचार्य राजश्री जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.*प्रा. भास्कर गटकूळ   यानी  जिल्हाधिकारी मा.राहुल जावीर यांचा सन्मान केला जिजाऊ *इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्था सर्वांची आहे , येथे महिलांना समान आणि  प्राधान्य दिले जाते व शैक्षणिक व सामाजिक कामात खुप अग्रेसर आहे असे मत व्यक्त केले .   *शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल गुंडेकर* यांनी  *प्रतेक सदस्य मध्ये एक अभ्यासू भुमिका व सामाजीक काम करण्याची जिद्द आहे व झाडे जपा * असे मत व्यक्त केले *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर शिंदे यांनी केले              *फळे झाडे जगवा ते तुमच्या आयुष्यात गोडवा  निर्माण करतील पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे .मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग वाचा निसर्ग वाचवा याची युवकांनी भविष्यात दखल घेऊन कर्तव्याची  जाणीव ठेवली पाहिजे* असे मत वृक्षप्रेमी  *सुमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले,* 
शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी *युवा पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळाली तर युवक उत्तुंग शिखरावर जाऊन दीपस्तंभ ठरतो हे आज आपल्या समवेत जिल्हाधिकारी मा. राहुलजी जाविर यांनी दाखवून दिले आहे*  असे मत व्यक्त केले. शौर्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी वृक्षारोपण केले.मयुर शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते