मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापुर तालुक्यातील  कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून त्या अनुषंगाने आज कारखान्याचे मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते तसेच मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
गाळप हंगाम वेळेत चालू होणेकरिता गाळप क्षमतेप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे टक-टॅक्टरचे आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी दिली.
     कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याने या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेञामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेञाची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊसक्षेञाची माहिती घेऊन 14 लाख मे.टन गाळपाचे उदिदष्ठ ठरविलेले असून ऊसतोडणी व वाहतुक यंञणा उभारणीचे काम जोमाने सुरु आहे. त्यानुसार टक व टॅक्टरचे 550 करार पूर्ण झालेले आहेत. तसेच बैलगाडी 700 व टॅक्टरगाडी 400 करार करणेचे काम सुरु असून ऊस वाहतुक कंञाटदारांना कारखान्याचे धोरणानुसार ऍ़डव्हान्स वाटपाचे काम सुरू आहे. त्यास तोडणी मुकादमांचा ही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
     येणा-या गाळप हंगामासाठी गरज पडलेस कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झालेल्या यंञणेसाठी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण यंञणेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या द़ुष्टीने कारखान्याच्या वतीने संपुर्ण खबरदारी घेणेत येईल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी यावेळी सांगितले.
     या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. भरतशेठ शहा, श्री. यशवंत वाघ, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. मानसिंग जगताप, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. विष्णू मोरे, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. सुभाष भोसले, श्री. पांडुरंग गलांडे, कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, वर्क्स मॅनेजर श्री. ए.सी. पोरे, चीफ केमिस्ट श्री. यु.के. कांदे, तसेच मुख्य शेतकी अधिकारी श्री. एस.जी.कदम व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते