मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापुर तालुक्यातील  कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून त्या अनुषंगाने आज कारखान्याचे मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते तसेच मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
गाळप हंगाम वेळेत चालू होणेकरिता गाळप क्षमतेप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे टक-टॅक्टरचे आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी दिली.
     कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याने या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेञामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेञाची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊसक्षेञाची माहिती घेऊन 14 लाख मे.टन गाळपाचे उदिदष्ठ ठरविलेले असून ऊसतोडणी व वाहतुक यंञणा उभारणीचे काम जोमाने सुरु आहे. त्यानुसार टक व टॅक्टरचे 550 करार पूर्ण झालेले आहेत. तसेच बैलगाडी 700 व टॅक्टरगाडी 400 करार करणेचे काम सुरु असून ऊस वाहतुक कंञाटदारांना कारखान्याचे धोरणानुसार ऍ़डव्हान्स वाटपाचे काम सुरू आहे. त्यास तोडणी मुकादमांचा ही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
     येणा-या गाळप हंगामासाठी गरज पडलेस कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झालेल्या यंञणेसाठी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण यंञणेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या द़ुष्टीने कारखान्याच्या वतीने संपुर्ण खबरदारी घेणेत येईल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी यावेळी सांगितले.
     या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. भरतशेठ शहा, श्री. यशवंत वाघ, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. मानसिंग जगताप, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. विष्णू मोरे, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. सुभाष भोसले, श्री. पांडुरंग गलांडे, कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, वर्क्स मॅनेजर श्री. ए.सी. पोरे, चीफ केमिस्ट श्री. यु.के. कांदे, तसेच मुख्य शेतकी अधिकारी श्री. एस.जी.कदम व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...