मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेची ऑनलाईन विशेष सभा आज  दिनांक २८.०७.२०२० दुपारी एक वाजता नगरपरिषदेची छत्रपती शिवाजी राजे सभागृहात व्हीडिओ कॉन्फरन्सीद्वारे संपन्न झाली यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे वर्ष विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यास मान्यता देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी प्रस्ताव मांडला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.
 यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या सर्व सदस्यांच्या वतीने इंदापूर शहरवासीयांच्या वतीने माननीय शासनास विनंती पत्र देणे येईल. यास सर्व सदस्यांनी मान्यता दिली.
    शताब्दी वर्षाची सुरुवात एक ऑगस्ट रोजी 100 झाडे लावून करण्यात येणार आहे. लोकमान्य नगर येथे लवकरच  ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे असे नगरसेवक भरत शहा यांनी सांगितले.हे ग्रंथालय सुसज्ज असे ग्रंथालय असावे म्हणून नगरपरिषद शासनास प्रस्ताव देखील पाठवणार आहे याबाबत राजश्री मखरे आणि दादासाहेब सोनवणे यांनी सूचना मांडली त्यावर याबाबत लवकरच शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल असे माननीय मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले. हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष साजरे करत असताना नगर परिषद  जे कार्यक्रम राबवू शकते सर्व कार्यक्रम राबवावेत याबाबतची सूचना गटनेते गजानन गवळी यांनी केली.
      या सभेस नगरपरिषदेचे  उपनगराध्यक्ष  धनंजय पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, गटनेते कैलास कदम, नगरसेवक गजानन गवळी, विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे तसेच सर्व  नगरसेवक हे उपस्थित होते. सभा अधीक्षक म्हणून गजानन पुंडे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...