इंदापूर :सायकल क्लब सदस्यांनी जिजाऊ इन्स्टिट्युट येथे सदिच्छा भेट दिली इंदापूर सायकल क्लबची आठवण म्हणून वृक्षारोपण केले.
प्रा डॉ भास्कर गटकुळ व प्रा डॉ जयश्री भास्कर गटकूळ यांनी स्वागत केले कोरोनाच्या या संकटात सकस आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार करून राहणे गरजेच आहे. शरीर हीच आपली संपत्ती आहे. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांना सहकार्य करा.असे मत प्रा डॉ भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले
सायकल लाँग राईड बाबत
▪️ अस्लम शेख म्हणतात आपली क्षमता पाहून व्यायाम करा तुम्ही आज 10 किलोमीटर सायकलिंग करा सरावामुळे नक्कीच तुम्ही 50 किलोमीटर लांबीचा पल्ला गाठू शकता न्यानदेवा डोंगरे याच्या मते सायकलिंग केल्यामुळे आयुष्यात उत्साह वाढतो आणि आरोग्य उत्तम राहून आयुष्य वाढते.
▪️आमचा खुशल कोकाटेच्या भाषेत चरबी हटाव लाईफ बढाव.
संस्थापक अध्यक्ष मोहिते सर म्हणतात एकत्र येण्या मुळे टिम वर्क तयार होते.
▪️ गौरव च्या भाषेत आनंद लूटायचा तर निसर्गाचा लूटा दारू व्यसन करून लाईफ संपवू नका.
▪️दशरथ भोंग यांच्या मते सायकलिंग.गंगावळणचा नदी चाढ न थांबता एकटेच सायकल वर पार केला. कामाच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यासाठी सायकलिंग आवश्यक आहे
▪️बाप्पु सावळकर यांनी
एकंदरीत ५० किमी सायकलिंग आमचा आजचा रविवार आनंदी समाधानी करून गेला
आमची हक्काची माणस ,नाते संबध आणखी घट्ट करून गेली. असे मत व्यक्त केले सकाळी 6.15 ला सगळै बाबा चौक येथे एकत्र आलो. इंदापूर ,कारखानापाटी,बनकरवाडी करेवाडी मार्गे कळाशी गंगावळण साधारण दोन्ही बाजूने ५० किमी राईड.जवळपास २० रायडर.वय वर्ष १४ ते वयवर्ष ६०. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक जे सामाजिक स्वास्थ्य जपतात. लोका साठी समाजासाठी जगतात अशा लोकांच शरीर स्वास्थ जपण्या साठी ह्या कल्बची निर्मिती. दर अठावड्यला २/३नविन सभासद जूडतायेत.नविन सहकारी जूने साथिदार सगळे मिळून मस्त आनंदी व अरैग्यदायी आयुष्य जगण्या साठी सायकलिंग ला जूडलोय.हेतू प्रामाणिक असला आणि माणस आपलेपणाची असली की सहज अनोळखी लोक आपले होतात.अशा शब्दात प्रशांत ऊषाभानुदास शिताप. यांनी मत व्यक्त करत प्रवासवर्णन सांगताना म्हणतात की
इंदापूर पोलिस स्टेशनचे पठाण साहेब, व आमचा युवा क्रांती प्रतिष्ठाणचा जूना सहकारी समाधान ठोंबरे व डाँ सुहास सातपूते यांनु सायकलिंग च्या दुसर्याच दिवशी ५० किमी सायकलिंग राईडची मानसिकता दाखवली तसेच अस्लमचा लहान मोयिन व वाघमारे सरांचा सिद्धार्थ ही लहान याच ही विशेष कौतूक..कारण म्हणतात लढाई ही पहिली मनात लढली जाते आणि नंतर रणात....जो मन जिंकतो त्याचा रणांगणात कधीच पराभव होत नाही. आपली पाॕझिटीव्ह मानसिकताच आपले मनोबल ऊंचावते. गौरव आणि ओंकार शिंदे कारखाना पाटी सोडून सगळे चाँदभाई वाघमारेसर डोंगरे पुढ लिड करत निसर्गाचा आनंद घेत अतिवृष्टी मूळ कुठ पाण्याने ऊफाळलेली रान बघत सगळेच बनकरवाडी करेवाडी कळाशी मागे टाकत गंगावळण च्या नदी किनारी पोहचलो तीन्ही बाजूने चंद्राकार भिमेचा वेढा आणि बेटा सारख वसलेले गंगावळण ,नयनरम्य परिसर पाहून मन भारावून गेले होते
टिप्पण्या