मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

आय कॉलेजच्या सृजनशीलतेतून साकारतोय ऑक्सीजन पार्क
    इंदापूर येथील आय कॉलेजच्या परिसरामध्ये  महाविद्यालयाने राबवलेल्या अनेक सृजनशील उपक्रमांतर्गत या परिसरात निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या ऑक्सीजन पार्कची निर्मिती झाली आहे.
      संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्‍यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सृजनशील उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर हा निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक व्हावा या हेतूने ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.
       याठिकाणी छोटी छोटी वने विकसित करण्यात आली असून या ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, उंबर, अर्जुन सादडा ,सिसम,पुत्रंजीवी, हत्तीलिंग, बेल, बेहडा, हिरडा, कैलासपती, कडुनिंब, जाई, जुई ,मोगरा ,सायली, कृष्णकमळ, पारिजातक,रुई, गोकर्ण, सोनचाफा, हिरवा चाफा, पिवळा चाफा, गुलमोहर, निलमोहर, शंखासुर, चिंच, विलायती चिंच, काटेसावर, कण्हेर, चंपा,बॉटलपाम, नारळ,ऑरोकॅरिया यासारख्या वनस्पतींची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या शहा नर्सरी मधुन ही रोपे मोफत उपलब्ध झाली. 
      या ऑक्सिजन पार्कमध्ये चिमणी, मैना, दयाळ, साळुंखी, मुनिया, टीपकेवाली मुनिया, टिटवी, पानकावळा, कोरमोरंड, ब्राह्मणी घार,ताम्हण, घुबड ,ब्राह्मणी मैना, भारद्वाज, वटवाघुळ, पारवा, कबुतर, वेडाराघू,पोपट, बाया, सुगरण, सुतार, लालबुड्या, कोतवाल यासारखे अनेक पक्षी यांची मांदियाळी याठिकाणी वास्तव्यास आहे.तसेच विविध जातींची फुलपाखरे व पतंग आहेत.एकूण सात बागांमध्ये जैव विविधता जोपासत ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली आहे. विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने ऑक्सीजन पार्क झाला.
   महाविद्यालयामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये सन्मानीय पाहुण्यांचे स्वागत झाडाचे रोपटे देऊन केले जाते तसेच त्यांच्या हस्ते या पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात येते. संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त देखील वृक्षारोपण करून हा वाढदिवस साजरा केला जातो यातूनच हे पार्क विकसित झाले आहे.
  वेगवेगळ्या प्रकारची फूल, पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हा परिसर महाविद्यालयाच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...