मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुरः जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित लाखेवाडी ता. इंदापूर येथील विद्यानिकेतन स्कूल अँड कॉलेजच्या विज्ञान शाखेमधील श्रद्धा राजेंद्र कवडे - देशमुख या विद्यार्थीनीने ९०.६१ टक्के प्राप्त गुणांसह प्रथम क्रमांक  मिळवत. क्रॉप सायन्स या विषयामध्ये राज्यात पहिला येणाचा मान मिळवला असल्याचे  संस्थेचे अध्यक्ष, माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी सांगितले.  
   तसेच  शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षातील इयता बारावीचा विज्ञान आणि वाणिज्य या दोन्हींही शाखांचा  निकाल शंभर टक्के लागला आहे. 
विज्ञान शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे : 
         श्रध्दा कवडे-देशमुख ही ९०.६१ टक्के गुण मिळून प्रथम, पल्लवी अशोक नागटिळक हिने ८८.४६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक  तर प्राची अविनाश नांगरे हिने ८५.५३ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळविला. 
वाणिज्य शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे : 
 गौरी तुकाराम चव्हाण ८२.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, प्रसाद दत्तात्रेय वाघमोडे ७६.३० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर प्राजक्ता कांतीलाल निंबाळकर ७५.२३ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळवला. 
        श्रद्धा कवडे-देशमुख हिला भविष्यामध्ये प्रशासनामध्ये अधिकारी होण्याचे तिचे स्वप्नआहे. यावेळी तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील तिचे कौतुक केले आहे.

       संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले  यांनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

       यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक गणेश पवार यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल वाघमोडे यांनी केले.
 लेकीने मिळविलेल्या घवघवीत यशानंतर पित्याचे मन गहिवरले..... 
"श्रध्दा कवडे-देशमुख हिचे वडील राजेंद्र कवडे-देशमुख उत्कृष्ट पत्रकार असून त्यांचे शिक्षण बी.एस.सी.अॅग्री झाले असून घरातुनच उत्कृष्ट संस्कार आणि वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले व त्या संधीचे श्रध्दाने आज सोने केल्याने पोरीने घवघवीत यश संपादन केल्याने पित्यास गहिवरून आले."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...