मुख्य सामग्रीवर वगळा

समृद्धी टाईम्स न्युज, स्वराज्य निर्माता न्युज

इंदापुर:राजर्षी छत्रपती शाहू महाराज. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या.त्यांनी सत्ता राबवली. स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती ध्येयधोरणे आखून विकासासाठी
शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते. गाद्यागिद्यांवर लोळणाच्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातलीनव्या युगाची पहाट ज्याच्या आगमनाने झाली, त्या या क्रांतिसूर्याचा जन्म २६ जून, १८७४ या दिवशी कोल्हापुरातील
सिस्टर्स पॅलेस येथे झाला. कागल येथील जयसिंगराव तथा
आबासाहेब घाटगे आणि राधाबाई राणीसरकार यांचे पुत्र
यशवंतराव म्हणजेच कोल्हापूरचे क्रांतदर्शी छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत.यशवंताचा जन्म झाला ,  अहमदनगरच्या तुरूंगात या चौथ्या शिवाजीचा सार्जंट ग्रीनच्या मारहाणीत २५ डिसेंबर १८८३ ला मृत्यू झाला.
याचवेळी संस्थानाचे रिजंट जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे यांचा दहा वर्षाचा मुलगा यशवंत यास कोल्हापूर संस्थानात दत्तक घेण्यास मुंबई सरकारने मान्यता दिली. यापूर्वीचे कोल्हापूर संस्थानात पाच छत्रपती अल्पायुषी ठरले होते . 
नव्या छत्रपतींच्या यशवंताच्या दत्तक विधानाला मान्यता मिळाल्यावर करवीर वासियांच्या आशा नव्याने पल्लवीत झाल्या. नव्या छत्रपतींच्या दत्तक विधान सोहळ्याची लगबग सुरू झाली,एका शानदार समारंभात यशवंतराव तथा शाहू हे छत्रपती बनले.  संस्थानांचे अधिपती, जहागिरदार ,राजप्रतिनिधी, सरदार, सरंजामदार इंग्रज अधिकारी हे
समारंभाला उपस्थित होते. यावेळी १९ तोफांची सलामी देण्यात आली. कोल्हापुरात-करवीर नगरीत आनंदोत्सव सुरू झाला,असे मत इंदापूर विचार मंथन परिवाराच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी शिवश्री, प्रा.श्रीमंत कोकाटे व्याख्यान पर भाषणात बोलत होते, 
हा कार्यक्रम राधिका हाॅल इंदापूर येथे विचार मंथन परीवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, 
शुक्रवारी  दुपारी १.०० वाजता राधिका हाॅल इंदापूर येथे छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन 
शिवश्री श्रीमंत कोकाटे सर यांचे शुभ हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य मा.सभापती, विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पुणे, सोनाई परिवाराचे कार्यकारी संचालक, मा. प्रविण भैया माने डाॅक्टर एकनाथराव चंदनशिवे
अधिक्षक इंदापूर उपजिल्हा  ग्रामिण रूग्नालय , डाॅक्टर शेळके , कोरोना ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर व परिचारिका इंदापूर उपजिल्हा ग्रामिण रूग्नालय मा. जयवंत नायकोडीसर जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग दत्तनगर इंदापुर त्यांचा सर्व स्टाफ ,पत्रकार अॅड,. नारायण ढावरे, महेश स्वामी, - निलकंठराव मोहिते , मा. सागर शिंदे  , मा, महेश स्वामी , मा, सुधाकर बोराटे ,मा. विलास आप्पा गाढवे , मा. धनंजय कळमकर
माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे 
या कार्यक्रमासाठी विचारमंथन ग्रुपचे ॲडमीन' माजी उपनगराध्यक्ष अरविंद ( तात्या ) वाघ , प्रा. कृष्णा ताटे , बाळासाहेब सरवदे , संदिपान कडवळे ,अनिकेत वाघ नगरसेवक , शिवाजीराव मखरे , अजिंक्य वाघ , हमीदभाई आतार, नितीनदादा आरडे , ॲड् . विशाल चव्हाण , वाल्मीक खानेवाले , निखील बंगाळे , निरज खानेवाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली नाचण यांनी केले
इंदापूर विचार मंथन परिवार सदस्य उपस्थित होते ....
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये  छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्य प्रतिमेचे पुजन करण्यात आले,
इंदापूर विचार मंथन परिवार सदस्य उपस्थित होते ....
विचार मंथन परिवार म्हणजे गोरगरीब जनतेच्या अन्नाची समशा सोडवणारा, आणि सामान्य जनतेचा आधार म्हणून भारतभर ओळखला जाईल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते