मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घ्या -हर्षवर्धन पाटील ,तलावात पाणी सोडण्यास प्रारंभ
इंदापूर  तालुक्यातील शेटफळ-हवेली तलावात नीरा डावा कालव्यामधून शुक्रवार (दि.26) सायंकाळ पासून पाणी सोडण्यात येत आहे.सध्या तलावामध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा आहे.शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरल्याशिवाय तलावात सध्या सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात येऊ नये,अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याकडे केली आहे.
                   ब्रिटिशकालीन असलेल्या शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 620 द.ल.घनफूट आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, वरच्या बाजूस असलेल्या  फलटण, बारामती आदी भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे, त्यामुळे तेथील पिकांना पाण्याची गरज नाही.सध्या तलावात नीरा डावा कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सुमारे 175 ते 180 क्यूसेक्स क्षमतेचा आहे.त्यामध्ये तातडीने वाढ करावी,अशी सूचना हर्षवर्धन पाटील यांनी अधीक्षक अभियंता धोडपकर यांच्याशी चर्चा करताना केली आहे.शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येईल,अशी ग्वाही अधिक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
                 शेटफळ-हवेली तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये भोडणी, वकिलवस्ती,बावडा, सराटी, निरनिमगाव, कचरवाडी(भगतवाडी), शेटफळ , पिठेवाडी, लाखेवाडी या गावांचा समावेश आहे.दरम्यान,शेटफळ तलावामध्ये पाणी सोडून, हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचे मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती.
 
             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...