मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापुर:शनिवार दि.20/6/2020 रोजी जातेगाव येथील माजी सैनिक कै. मनोज औटी यांच्या दशक्रिया विधी संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मंदिरांमध्ये उपस्थित सर्व माजी सैनिकांची छोटीसी मीटिंग घेऊन उपस्थित सर्व माजी सैनिकांच्या बरोबर फेडरेशन विषयी सर्व माहिती देऊन विचार विमर्श करून त्यावर चर्चा झाली व त्याच वेळी तेथील मिटिंग संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व माजी सैनिक राळेगण-सिद्धी येथील सैनिकांचे आधारस्तंभ अण्णा हजारे साहेब यांची भेट घेऊन सैनिकांच्या विषयी होत असलेल्या अन्याय विषयी आडचणी विषयी 
आघाडीचे अध्यक्ष नारायन आंकुशे साहेब ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत साहेब सुभाष दरेकर साहेब संदीप भाऊ लगड हनुमंत निंबाळकर साहेब बीएफ निंबाळकर शामराव धुमाळ साहेब शिवाजी कदम साहेब  नरसाळे साहेब महादेव सोमवंसी फ्लेचर पटेल साहेब अनिल खेडकर मुंडे साहेब थेऊरकर साहेब अर्जुन खेडकर सौ पुष्पाताई मुंडे डॉ आर्चना आघाव व इतर अनेक उपस्थित माजी सैनिकांनी आपल्या व्यथा मांडल्या व तसेच सैनिकांचे प्रश्न 
सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम आजी-माजी सैनिक संघटना एकत्रित करून फेडरेशन बनवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असणारे नारायण अंकुशे साहेब सुधीर सावंत साहेब सुभाष दरेकर साहेब यानी या विषयी सर्व माहिती देऊन त्या विषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले व त्याविषयी अण्णांना सविस्तर माहिती दिली असता अण्णांच्या कडून आपण फेडरेशन साठी ग्रीन सिग्नल भेटला व व सर्वजण उशिरा का होईना पण जागे झालात काही हरकत नाही हे जे फेडरेशन बनवण्यासाठी  आपण सर्वांनी एकत्रित येऊन  तयारी दर्शविली आहे त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व असे सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणाऱ्या सैनिकांना आपण सर्वांनी सपोर्ट करणे जरुरी आहे असे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितले काही व फेडरेशन कसे असावे ते कसे चालवावे या विषयी थोडक्यात उपस्थित सर्व माजी सैनिकांना मार्गदर्शन सुद्धा केले व मी ह्या फेडरेशन मध्ये सहभागी होणार नाही परंतु फेडरेशन चालवण्यासाठी कुठल्याही मदतीची गरज भासल्यास मी आपणास बाहेरून सर्वतोपरी मदत जरूर करीन हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. 
 त्याच प्रसंगी नारायण आंकुशे ब्रिगेडियर सावंत यांनी अण्णा हजारे यांना शब्द दिला की लवकरात लवकर फेडरेशनची पूर्ण तयारी करून ह्याच ठीकाणी तुमच्याच हाताने उद्घाटन करून सुरुवात केली जाईल.असेही ते म्हणाले, 
 त्या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे अशी मागणी करत महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक संघटना एकत्र आल्या होत्या त्यामध्ये इंदापूर शहरातील माजी सैनिक व शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी मेजर रविराज पवार मेजर मंगेश जाधव मेजर मंगेश सोनवळ त्या गावांमध्ये जाऊन त्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील झाले होते सर्व सैनिकांनी यापुढेही कोणत्याही सैनिकांवर अन्याय झाला महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक सैनिक एकत्र येऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवला जाईल ज्या सैनिकांनी देशासाठी मातृभूमीसाठी आपल्या परिवारापासून दूर राहून आपल्या जीवावर खेळून देशाचे रक्षण करणारा सैनिक यापुढे त्याच्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही वयानंतर राळेगण-सिद्धी या ठिकाणी जाऊन माजी सैनिक अण्णा हजारे साहेब यांच्याशी ही मुलाखत करण्यात आली त्यांनीही या जवानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे
भारतीय सेनेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत...
पंजाब रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, मराठा लाइट इंफंट्री व महार रेजिमेंट ह्या त्यातल्या काही रेजिमेंट आहेत, सगळ्याच जन्मजात पराक्रमी...
यांच्या सर्वांच्या युद्धगर्जना 
*********battel cry,किंवा war cry*************

अतिशय सुंदर आणि आत्मिक शक्ती जागृत करणाऱ्या आहेत...
पंजाब रेजिमेंटची युद्धगर्जना 
"जो बोले सौ निहाल । सत श्री अकाल । " अशी आहे.
नागा रेजिमेंटची युद्धगर्जना 
"जय दुर्गा नागा" अशी आहे.
जाट रेजिमेंटची युद्धगर्जना 
"जाट बलवान, जय भगवान" आहे.
डोग्रा रेजिमेंटची युद्धगर्जना 
"ज्वाला माता कि जय" अशी आहे.
तर, 
बिहार रेजिमेंटची 
"जय बजरंगबली" अशी आहे.
सगळ्या युद्धगर्जना त्यांच्या-त्यांच्या देवांच्या नावाने आहेत...
पण, यामध्ये दोन रेजिमेंटच्या युद्धगर्जना थोड्या वेगळ्या आहेत,
त्यांच्या युद्धगर्जना अतिशय मनाला भावतात, त्या दोन रेजिमेंट म्हणजे.. 
"महार रेजिमेंट आणि 
 मराठा लाइट इन्फ्रंट्री....!"
महार रेजिमेंटची युद्धगर्जना, 
"बोलो भारत माता की जय" 
अशी आहे...
देशाचं नाव असलेली ही एकमेव युद्धगर्जना......
तर मराठा लाइट इन्फंट्रीची युद्धगर्जना 
"बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!" 
अशी जबरदस्त आहे...
ही एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, 
एका महापुरूषाच्या नावाने आहे...
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल. 👍
इ.स. १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे. या प्रांतात उंच उंच अशा डोंगर रांगा आहेत. या डोंगर रांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक". हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती. बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता. परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या. आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून दाखवतो. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर ? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांच्या स्वार्थापोटी नाईलाजाने त्यांनी ही परवानगी दिली.
नंतर आपल्या लोकांनी .. 
 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' 
म्हणत एका रात्रीत किल्ला सर केला. 
आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली.
या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहात नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...