मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर:कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त सेमिनार राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाजमंञी, कारखान्याचे आदरणीय चेअरमन, मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील, व्हा.चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले, निरा-भिमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री. लालासो पवार, व्हा.चेअरमन श्री. कांतीलाल झगडे व दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे प्रतिनिधी डॉ.श्री. एस.व्ही. पाटील – हेड अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट, श्री. राजेंद्र गोडगे – अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट, डॉ.श्री. शिदनाळे – टेक्निकल ऍ़डव्हाईजर यांचे मार्गदर्शनार्थ ज्युस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल बी हेवी मोलासेस टू इथेनॉल या विषयावरील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी महत्वपूर्ण सेमिनार पार पडले. त्यावेळी व्ही.एस.आय.चे प्रतिनिधींनी ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी मोलासेस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल विषयी सविस्तर व सखोल चर्चा झाली. परिसंवादात मान्यवरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन केंद्र सरकारने इथेनॉलसाठी नविन केलेले धोरण, चांगला दिलेला दर याविषयी सेमिनारमध्ये सविस्तर चर्चा होऊन साखर कारखान्यामध्ये साखरेचा साठा विक्रीअभावी वाढलेने सतत येणा-या अडचणीमुळे साखरेच्या किंमती कमी होणे यावरती इथेनॉल निर्मिती हा कायमस्वरूपी व शाश्वत पर्याय आहे. केंद्रसरकारने इथेनॉलचे दर कायम ठेवले आहेत. त्यात बदल होत नाही. इथेनॉलची इंधनासाठी मागणी भविष्यात वाढतच जाणार आहे. इथेनॉल वापरामुळे पर्यावरणाची हानी रोखली जाते. इथेनॉलनिर्मितीमुळे साखर कारखान्यास अधिकचा महसूल मिळून सभासदांना त्याचा फायदा होणार आहे. सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी मोलासेस टू इथेनॉलमुळे बाजारातील साखर साठा कमी होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. पर्यायाने अतिरिक्त साखर कमी होऊन साखरेचे दर वाढणार आहेत. इथेनॉलचा वापर व दर चांगला असल्याने त्वरित पैसे मिळून विक्रीविना पडून राहणा-या पोत्यांवरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे. सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी मोलासेस टू इथेनॉलमुळे स्टिम, वीज यामध्ये बचत होऊन कारखान्याचा क्रशिंग रेट तसेच आसवनीची क्षमता वाढणार आहे. साखरेच्या दर्जामध्ये सुधारणा होणार आहे.  

      याप्रसंगी कारखान्याचे आदरणीय चेअरमन, राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाजमंञी, मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील, व्हा.चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले, निरा-भिमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री. लालासो पवार, व्हा.चेअरमन श्री. कांतीलाल झगडे व दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री.बी.जी. सुतार, निरा-भिमा कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री. गेंगे, तसेच दोन्ही कारखान्याचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते