मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर: शिरसोडीतील मायलेकिंना इंदापूरात यशस्वी उपचार मिळाल्याने अवघ्या १२ दिवसात झाल्या कोरोनामुक्त :- माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे
शिरसोडी (इंदापुर) मायलेकींवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर यांचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केले स्वागत इंदापूर तालुक्यात शिरसोडी येथे मुंबई वरून आलेल्या मायलेकींचा १७ मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यावर इंदापूर येथील उपचारादरम्यान अवघ्या १२ दिवसात ठणठणीत झाल्या आहे. इंदापूर शहरा नजिक असलेल्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये ह्या मायलेकिंवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आरकिले व संपूर्ण कोव्हिड १९ च्या टीमने यशस्वी उपचार केल्याने मायलेकी कोरोनामुक्त झाल्या. व पोंडकुलवाडीचे  दोन कोरोना रुग्ण लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन स्वतः च्या घरी जातील असे डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर व संपूर्ण कोव्हिड १९ टीमचे मनापासून आभार मानतो. दि.३० मे २०२० रोजी भिमाई परिवाराच्या व बामसेफच्या वतीने माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे व बामसेफ चे कुमार काळे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे सर यांचा सत्कार पुष्पहार, शाल व शक्ती भक्तीची मूर्ती देऊन केला. रुग्णांचे swyab घेणारे रणजीत भोसले यांचे स्वागत करण्यात आले. आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे. इंदापूर तालुका आपल्याला कोरोनामुक्त करायचा आहे. त्या करिता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामा व्यतिरिक्त घराबाहेर नागरिकांनी पडता कामा नये. शासनाने केलेल्या सूचनांचे पालन योग्य रितीने नागरिकांनी करावे असे आवाहन मखरे यांनी केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनखाली काम करणाऱ्या सर्व टीम चे मनापासून आभार. डॉ. अरविंद आरकिले, पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ मॅडम, डॉ. विनोद राजपुरे, डॉ. सुहास शेळके, डॉ. गार्डे, डॉ. साळुंखे, डॉ. सिंग मॅडम, लॅबच्या पठाण व गायकवाड मॅडम, तसेच राजेश चिकणे, अजय जगताप या सर्व टीमचे भिमाई परिवार व बामसेफच्या वतीने आभार. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, रणजीत भोसले, बामसेफचे कुमार काळे, अॅड.राहुल मखरे, श्रीम. शकुंतला मखरे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...