मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर:कोरोना विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे : हाजी एम. डी. शेख संपादक दै.बंधूप्रेम,अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ,विषाणूजन्य संसर्गाशी लढणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी.शेख, सेक्रेटरी अरुणकुमार मुंदडा, कोषाध्यक्ष वाय. ए. सिद्दिकी, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे. यासंदर्भात लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे,व शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर यांच्याशी बोलताना हाजी.एम. डी. शेख म्हणाले, दि. 25 मार्च 2020 पासूनदेशातलॉकडाऊन असून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोव्हीड 19 ही राष्ट्रीय आपत्ती आहे. केंद्र सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे मात्र ते अपुरे आहेत. मात्र राज्य सरकारनेस्वखर्चातून राज्यातील जनतेला कोव्हीड 19 पासून वाचविण्यासाठी तसेच कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी व पोलिस यांना मृत्यू झाल्यास राज्य शासनाच्यावतीने 50 लाख रुपयांचे सुरक्षाकवच मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना देण्याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.कोरोनापासूननागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक पत्रकारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या अनेक योध्यांबरोबरच प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना देखील शासकीय सुरक्षाकवच मिळाले पाहिजे अशी दुरुस्ती या शासन परिपत्रकात शासनाने करणे गरजेचे आहे. पत्रकारांचा या परिपत्रकात समावेश झाल्यास त्यांना देखील न्याय मिळेल. त्यामुळेकोव्हीड 19 वर मात करताना कोरोना विरोधी युद्धांमध्ये पत्रकारांना शासकीय सुरक्षा कवच देणे ही काळाची गरज आहे. 
*****************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...