मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात भाग्यश्री बंगला येथे महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. या आंदोलनात राजवर्धन पाटील हे सहभागी झाले होते.

इंदापूर: राज्य सरकार कोरोनाचे संकट रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानाच्या अंगणात शुक्रवारी (दि.22) महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.
             महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र बचाओ  आंदोलन प्रसंगी केला. 
             हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू होऊन 2 महिने  झाले, तरीही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी न होता वाढतच चाललेला आहे, त्यामुळे दररोज अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.प्रत्येक कोरोना बाधित रुग्णावर मोफत औषधोपचार वेळेवर करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, मात्र अनेकवेळा रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.कोरोना रुग्णावरती उपचारांमध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
                      कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शासकीय पातळीवर नियोजन व्यवस्थित होत नसल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता त्रस्त असून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने  सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
            तसेच राज्यात तसेच इंदापूर तालुक्यात जनतेच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगातून गावागावात कामे सुरू करण्यात यावीत. लॉक डाऊनमुळे जनता अडचणीत असल्याने मागणीनुसार तत्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करण्यात यावेत.त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यात संस्थात्मक क्वारंनटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. इंदापूर तालुक्यात राज्यकर्ते कोरोनाचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत,असे आंदोलन प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी भाजपच्या कार्यकर्त्यांना अंगणामध्ये महाराष्ट्र बचाओ आंदोलन उस्फूर्तपणे केले.एकंदरीत तालुक्यामध्ये या आंदोलनास जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.
______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...