मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापुर: मा.ना.हर्षवर्धन पाटील यांना शह देण्यासाठीच भरणे यांनी तातडीने  आढावा बैठक घेतल्याची चर्चा आहे.
  दत्तात्रय भरणे राज्यमंत्री झाले.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद अपघाताने भरणे यांच्याकडे आले.त्यानंतर भरणे इंदापूर तालुक्यातील मोक्याच्या गावात संसारोपयोगी वस्तुंच्या वाटपाच्या निमित्ताने फोटोपुरते दर्शन देत होते.पालकमंत्री या नात्याने ते बहुतेक काळ सोलापूर जिल्ह्याचे निवासी झाले होते.
  मागील आठवड्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सक्रीय झाले. राज्य जिल्हास्तरावरील प्रशासकीय अधिका-यांच्या संपर्कात राहून त्यांनी कोरोना व लाॅकडाऊन बाबत माहिती काढली.जिल्हाबंदी शिथील केल्यानंतर घडणा-या बाबींचा अंदाज आल्यावर पाटील यांनी तालुक्यात पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. 
इंदापुर तालुक्यातील जिल्हा परिषद पुणेआरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करुन  बांधून दिलेली अनेक गावातील प्राथमिकआरोग्य केंद्र अद्याप तरी उदघाटनाच्या प्रतिकक्षेत आहेत, ते आमदारांना माहिती नाही काय?ती का चालू केली नाहीत हा संशोधनाचा विषय आहे याला जबाबदार कोण?आशी सामान्य जनतेत चर्चा आहे? अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी कमी आहेत, हा प्रश्न फारच गंभीर आहे. 
 मनरेगाची कामे सुरु करावीत. शिधापत्रधारकांना विनासायास गहू व तांदूळ मिळावा.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे.या मागण्या शासनदरबारी लावून धरल्या.तहसीलदारांकडे शिष्टमंडळ नेवून चर्चा ही केली.
  हर्षवर्धन पाटील सक्रिय झाल्यानंतर,तालुक्यात कोरोना नाही म्हणून खुशमस्क-यांकडून आपली पाठ थोपाटून घेणारे भरणे जाग्यावर आले.बाहेरुन येणारे लोक,वस्तुस्थिती,संभाव्य परिणाम याची जाणीव त्यांना झाली.हर्षवर्धन पाटील यांचे भाजपशी असणारे नाते त्यांना थेट केंद्र सरकारकडे घेवून जाते.यामुळे परत पाटील  डोईजड होवू नयेत या एकाच कारणासाठी भरणे यांनी पाटील यांना शह देण्यासाठी ही आढावा बैठक घेतल्याची सर्वत्र चर्चा आहे
  या आढावा बैठकीत इंदापूर तालुक्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे सक्तीने विलगीकरण करण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी (दि.१६ मे) तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
  इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय वसतिगृह व भिगवण ट्रॉमा सेंटर या ठिकाणी संशयित कोरोना रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे,अशी माहिती ही त्यांनी या वेळी दिली.
  ते म्हणाले की,कोरोना संक्रमणाचा महत्वाच्या टप्पावर आपण आहोत.गावपातळीवर तलाठी,पोलीस पाटील, ग्रामसेवक,कोतवाल यांनी सजग रहाणे गरजेचे आहे.शहरात व गावात आलेल्या बाहेरच्या माणसाची माहिती प्रशासनास कळवण्यात यावी.त्याची तात्काळ दखल घेतली जाईल,असे ते म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते