मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


  
इंदापुर तालुक्यातील व उजनी धरणा शेजारील हिंगणगाव येथे आशावर्करांना सेनिटाझरचे वाटप करण्यात आले,हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार करण्यात आला,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्यासाठी देवदूत:-जि. प. सदस्य अभिजीत तांबिले म्हणाले कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.आत्ता तर पुणे सोलापूर रोड वरून ठाणे पोलिस चे अधिकारी गेले व ते कोरोना पॉझिटीव्ह आसल्याची खात्री झाली, त्या मुळे काही पोलीसांना चाचणीसाठी  पाठवले आहे त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
 काटी-वडापुरी जि. प.सदस्य अभिजीत तांबिले हे हिंगणगाव येथील उपकेंद्रात आशावर्करांना सेनिटाझर वाटप या कार्यक्रमात बोलत होते,तांबिले म्हणाले की आपणास हिंगणगाव सील बंद करावे लागेल, वेळ प्रसंगी ग्रामदुत म्हणून रस्त्यावर उभारहावे लागेल, किराणा सामान, मंडई, घरपोहोच कशी मिळेल या साठी प्रयत्न केला पाहिजे,  या वेळी तरडगाव चे सरपंच पोपट माने, व हिंगणगाव चे कर्तव्य दक्ष व गावक-यासाठी नेहमीच तत्पर आसणारे व गोरगरीब जनतेचा कैवारी, अन्यायाचा कर्दन काळ हिंगणगाव चे धडाकेबाज  सरपंच रमेश देवकर म्हणाले की आपल्याच  गावातील काही लोकं  अपवाद वगळता बाहेरील  गावच्या रस्त्यावरून पुणे, मुंबई,येथून सोलापूर कडे जाणा-या लोकांना सिमा बंदी आसल्या मुळे पोलिस यंत्रणा सोडत नाही, म्हणून  चीरी मीरी साठी 100,200 रू. च्या लालचेला बळी पडून  या कडेवरून त्या कडेला अनेक मोटारसायकल पोहचवत आहेत एकीकडे पोलिस सोडत नाही आणि आपण आपला जिव धोक्यात घालून कोरोना आपल्या घरात आणत आहोत. हि लाजीरवानी बाब आहे आसे मत देवकर यांनी व्यक्त केले.  या वेळी  व ग्रामसेवक रामेश्वर साठे,इंदापुर ता. वै.अधिकारी डाॅ. पोळ मॅडम, डाॅ.यादव,एच.ओ.शिंदे मॅडम, आरोग्य सेविका, आशावर्कर आणी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंगाडे,कैलास देवकर, विशाल जगताप, सामाजिक कार्यकर्ते नितीन आरडे, ग्रामपंचायत कर्मचारी  समाधान देवकर, अमोल आरडे, पांडुरंग गरड ,पत्रकार शिवाजीराव पवार,शिवसृष्टी न्युज  चे संपादक धनंजय कळमकर ,इ.उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे आभार हिंगणगाव चे कर्तव्य दक्ष ग्रामसेवक रामेश्वर साठे यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...