मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:(शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज वृत्तसेवा इंदापुर)द्राक्षे बागायत दारांचे कोट्यावधी
रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे व सोलापूर
जिल्ह्यातील लाखो हेक्टर द्राक्ष पिके मातीमोल झाल्याने
द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.
तोडायला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहेत किंवा
वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर
कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष
बागायतदारांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
करून विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे
मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माने म्हणाले की द्राक्षांपासून व
मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र इंदापूर आणि मोहोळ
तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतक-्यांचे नुकसान झाले
आहे. इंदापूर तालुक्यात अनेक  भागात मोठ्या प्रमाणात
द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे
हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी एक
हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. द्राक्ष
बागायतदारांना एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो तर
केळी बागायतदारांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये
खर्च येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला खर्च वाया
गेला आहे या बरोबरच एक वर्ष केलेले कष्ट आणि विज
बिल भरावे लागणार असल्याने शेतक-्यांचे पुरते कंबरडे
मोडले आहे. तालुक्यातील दुष्काळी भागात शेतक-यांनी
शेततळ्यांच्या पाण्यावर द्राक्ष पिक घेतले आहे. यामुळे
कर्जाचा बोजा वाढणार आहे. या अवस्थेत  शेतकरी
असल्याने शासनाला मदत करण्याची मागणी करणार
असल्याचे मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंत (तात्या) माने यांनी सांगितले.
द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पाऊस, हवामानातील
बदल, बाजार भावाचा चढ उतार सहन करावा लागत 
असतानाच आता कोरोनाच्या संकटाने द्राक्ष
बागायतदारांचे आतोनात हाल झाले आहेत, महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष
उत्पादनात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा
सहभाग आहे. राज्यातील नाशिक पाठोपाठ इंदापूरचे व
मोहोळ तालुक्यातील शेतकरी अधिकची द्राक्ष उत्पादित
करत आहेत. मात्र वेळोवेळी येणा-या संकटाने द्राक्ष
बागायतदार पुरता कोलमडला आहे.आसे मत आ.यशवंत माने यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले.

********************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...