मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:(शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज वृत्तसेवा इंदापुर)द्राक्षे बागायत दारांचे कोट्यावधी
रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे व सोलापूर
जिल्ह्यातील लाखो हेक्टर द्राक्ष पिके मातीमोल झाल्याने
द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.
तोडायला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहेत किंवा
वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर
कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष
बागायतदारांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
करून विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे
मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माने म्हणाले की द्राक्षांपासून व
मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र इंदापूर आणि मोहोळ
तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतक-्यांचे नुकसान झाले
आहे. इंदापूर तालुक्यात अनेक  भागात मोठ्या प्रमाणात
द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे
हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी एक
हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. द्राक्ष
बागायतदारांना एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो तर
केळी बागायतदारांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये
खर्च येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला खर्च वाया
गेला आहे या बरोबरच एक वर्ष केलेले कष्ट आणि विज
बिल भरावे लागणार असल्याने शेतक-्यांचे पुरते कंबरडे
मोडले आहे. तालुक्यातील दुष्काळी भागात शेतक-यांनी
शेततळ्यांच्या पाण्यावर द्राक्ष पिक घेतले आहे. यामुळे
कर्जाचा बोजा वाढणार आहे. या अवस्थेत  शेतकरी
असल्याने शासनाला मदत करण्याची मागणी करणार
असल्याचे मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंत (तात्या) माने यांनी सांगितले.
द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पाऊस, हवामानातील
बदल, बाजार भावाचा चढ उतार सहन करावा लागत 
असतानाच आता कोरोनाच्या संकटाने द्राक्ष
बागायतदारांचे आतोनात हाल झाले आहेत, महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष
उत्पादनात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा
सहभाग आहे. राज्यातील नाशिक पाठोपाठ इंदापूरचे व
मोहोळ तालुक्यातील शेतकरी अधिकची द्राक्ष उत्पादित
करत आहेत. मात्र वेळोवेळी येणा-या संकटाने द्राक्ष
बागायतदार पुरता कोलमडला आहे.आसे मत आ.यशवंत माने यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले.

********************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते