मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर तालुक्यातीलबावडा येथे जयहिंद फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर 
रक्तदान शिबिर काळाची गरज आहे-मयुरसिंह पाटील
इंदापुर:कोरोना  वायरच्या पार्श्वभूमीवर बावड्यात जय हिंद फाऊंडेशनचे संस्थापक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिह पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान हे काळाची गरज समजून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जय-हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते यापूर्वी फाउंडेशनचे अध्यक्ष मयूरसिह पाटील यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून करुणा व्हायरस बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले होते.तो व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरस झाला त्या व्हिडिओमध्ये केलेल्या सूचना या तंतोतंत असल्याने त्याचे पालन करणे सोपे गेले. महाराष्ट्रात करुणा वायरच्या पार्श्वभूमीवर रक्तदान हे महत्त्वाचे असून ते काळाची गरज असल्याचे ओळखून जय हिंद फाऊंडेशन ची सर्व टीम व अध्यक्ष यांनी काळाची गरज ओळखून दिनांक 28 मार्च रोजी बावडा येथे प्राथमिक आरोग्य केंद येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजे प्रयत्न रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने येणाऱ्या रक्तदात्यांनी काही नियम पाळले पाहिजेत यामध्ये प्रामुख्याने रक्तदाता हा प्रदेशातून आलेला नसावा , यापूर्वी त्याला कोणताही आजार नसावा' 
रक्तदात्यांना सर्दी खोकला यासारखा तात्पुरत्या स्वरूपात आजार नसावा , या अटी आयोजकांनी घातल्या आहेत. बावडा येथे रविवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे यावेळी संजीवनी मेडिकल ट्रस्ट तर्फे सँनी टायझर वाटप करण्यात येणार आहे , इंदापूर तालुक्यामधील सामाजिक संस्था व जय हिंद फाउंडेशन नेहमीच संकटकाळी धावून आले आहे



**********************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...