मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर ;तालुक्यातील काही किराणा दुकान दार माजले फार यावर प्रशासन कारवाई कधी करणार .....
कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे
त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान मा .नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसाचा लोक डाऊन घोषीत केलेला आहे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा आपल्या कसोटीचा काळ असून यiचे तंतोतंत पालन करावे
असे अवाहन व कळकळीची विनंती देखील केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, पत्रकार,आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत सहज उपलब्ध करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.परंतु
ग्रामीण भागातील काही अपवाद वगळता  दुकानदार किराणा मालाच्या कृत्रिम तुटवडा दाखवून
मालाच्या किमतीत भरमसाठ लूट करत असल्याचे उघडकीस येत आहे.उदाहरणार्थ: शेंगदाणे 80रू,होते 110 रू.तेलपुडा 90चा 110,साखर 36रू,ची40रू.बेसन 70रू.चे 90रू.गुळ 38रू.चे 42रू.मुगदाळ 90रू.ची 110 ..रूपयांने विकतात प्रत्येक मालाच्या नगाचे दर भरमसाठ वाढवून चढ्या भावाने विक्री केली जाते.... 
यावर शासनाने आवश्यक ते निर्बंध घालावेत अशी सर्वसामान्यांमधून मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून करोणा विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी
देशात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून दिवस रात्र जागता पहारा देत आहेत. या संचार बंदी मधून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या ख-या पण  ग्रामीण भागातील किराणा दुकानदार मालाचा कृत्रिम तुटवडा दाखवून मालाच्या किमतीमध्ये सर्वसामान्यांची लूट करताना दिसत आहे अनेक वस्तूंच्या किमती वाजवी दरापेक्षा दुपटीने वाढवल्याचे आढळून
येत आहे. किरकोळ किराणा सामान खरेदीसाठी लोक दुकानात गेल्यावर जीवनावश्यक असलेल्या मालाच्या किमतीत जाणीवपूर्वक वाढकेल्याचे आढळून आले. एकतर सरकार ला सहकार्य व देश वाचविण्यासाठी जनता देखील घरातून बाहेर पडण्यासाठी उत्सुक नाही.
पण अशा  जर दुकानदारांनी किंमती वाढवल्या तर लोक बेभान झाल्याशिवाय राहणार नाहीत.
येत्या काही दिवसांत जर असेच चालू राहिले तरी करोनाच्या विरोधात असलेल्या युद्धात वेगळेच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे शासनाने किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
ठेवण्याच्या सूचना सर्वच दुकानदारांना द्याव्यात अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे.
जिल्हा सीमा बंदी आसली तरी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास शासनाने प्रत्येक वाहनधारकास सुट दिली आहे  मालाचा कृत्रिम तुटवडा  भुरटे किराणा दुकानदार दाखवून ग्राहकांची लूट करत आहेत  त्या मुळे  जनसामान्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस झटत आहेत आणि दुसरीकडे ना-लायक अपवाद वगळता काही  किराणा दुकान दार त्यांची ईज्जत घालवतात.  आशा किराणा दुकान दाराची.लायसेन्स रद्द करण्यात यावे, व देशद्रोही चा गुन्हा दाखल करण्यात यावा ......


**********************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...