मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर ;तालुक्यातील काही किराणा दुकान दार माजले फार यावर प्रशासन कारवाई कधी करणार .....
कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे
त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान मा .नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसाचा लोक डाऊन घोषीत केलेला आहे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा आपल्या कसोटीचा काळ असून यiचे तंतोतंत पालन करावे
असे अवाहन व कळकळीची विनंती देखील केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, पत्रकार,आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत सहज उपलब्ध करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.परंतु
ग्रामीण भागातील काही अपवाद वगळता  दुकानदार किराणा मालाच्या कृत्रिम तुटवडा दाखवून
मालाच्या किमतीत भरमसाठ लूट करत असल्याचे उघडकीस येत आहे.उदाहरणार्थ: शेंगदाणे 80रू,होते 110 रू.तेलपुडा 90चा 110,साखर 36रू,ची40रू.बेसन 70रू.चे 90रू.गुळ 38रू.चे 42रू.मुगदाळ 90रू.ची 110 ..रूपयांने विकतात प्रत्येक मालाच्या नगाचे दर भरमसाठ वाढवून चढ्या भावाने विक्री केली जाते.... 
यावर शासनाने आवश्यक ते निर्बंध घालावेत अशी सर्वसामान्यांमधून मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून करोणा विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी
देशात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून दिवस रात्र जागता पहारा देत आहेत. या संचार बंदी मधून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या ख-या पण  ग्रामीण भागातील किराणा दुकानदार मालाचा कृत्रिम तुटवडा दाखवून मालाच्या किमतीमध्ये सर्वसामान्यांची लूट करताना दिसत आहे अनेक वस्तूंच्या किमती वाजवी दरापेक्षा दुपटीने वाढवल्याचे आढळून
येत आहे. किरकोळ किराणा सामान खरेदीसाठी लोक दुकानात गेल्यावर जीवनावश्यक असलेल्या मालाच्या किमतीत जाणीवपूर्वक वाढकेल्याचे आढळून आले. एकतर सरकार ला सहकार्य व देश वाचविण्यासाठी जनता देखील घरातून बाहेर पडण्यासाठी उत्सुक नाही.
पण अशा  जर दुकानदारांनी किंमती वाढवल्या तर लोक बेभान झाल्याशिवाय राहणार नाहीत.
येत्या काही दिवसांत जर असेच चालू राहिले तरी करोनाच्या विरोधात असलेल्या युद्धात वेगळेच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे शासनाने किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
ठेवण्याच्या सूचना सर्वच दुकानदारांना द्याव्यात अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे.
जिल्हा सीमा बंदी आसली तरी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास शासनाने प्रत्येक वाहनधारकास सुट दिली आहे  मालाचा कृत्रिम तुटवडा  भुरटे किराणा दुकानदार दाखवून ग्राहकांची लूट करत आहेत  त्या मुळे  जनसामान्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस झटत आहेत आणि दुसरीकडे ना-लायक अपवाद वगळता काही  किराणा दुकान दार त्यांची ईज्जत घालवतात.  आशा किराणा दुकान दाराची.लायसेन्स रद्द करण्यात यावे, व देशद्रोही चा गुन्हा दाखल करण्यात यावा ......


**********************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते