मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कोरोना ला हद्दपार करण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशनचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून काम करतील -दिपक आण्णा काटे,..सामान्य जनतेचा आधार

 इंदापूर: शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य  संस्थापक,  अध्यक्ष पै. दिपकआण्णा काटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणार शिवधर्म फाउंडेशन अशी पत्रकारांना माहिती दिली.
 सध्या भारतामध्ये जो  कोरोना व्हायरसचं   खूप मोठ संकट घोंगावत आहे. या संकटात अनेक डॉक्टर ,  नर्स,  पोलिस अधिकारी , सामाजिक संघटना, खुप मोलाचं  काम करतात या सर्वांना शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं शेलूट करत आहे .
  शिवधर्म फाऊंडेशन माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रात  हजारो कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. वेळप्रसंगी महत्त्वाचे कार्यकर्ते जसे  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मूठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली.
 त्याप्रमाणे आमच्या शिवधर्म फाऊंडेशनचे महत्त्वाचे कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात वेळप्रसंगी कोरोना व्हायरस या आजाराला तोंड देण्यासाठी किंवा डॉक्टर , नर्स , पोलीस,  पत्रकार यांना मदत करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून काम करतील असे त्यांनी जाहीर केलं.
पुर्ण विश्वामध्ये कोरोना व्हायरस हा आजार थैमान घालत असताना अतिशय प्रगतशील देशांनी कोरोना व्हायरसपुढे हात टेकले असतानां भारतात देश  हा  दऱ्याखोऱ्याचा ,  अनेक जाती धर्माचा , अनेक रुढी, पंरपंरा , चालढाल,  अनेक भाषा  आशा प्रकारचा देश असताना आदरणीय भारताचे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतले त्यामध्ये लॉकडाऊन , संचारबंदी , जनता कर्फ्यू , हे सर्व अतिशय खूप चांगले निर्णय घेतले असून आतापर्यंत भारतासाठी जे आदरणीय  नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेतले आहेत असे त्यांच्यासारख्या एक ही  निर्णय कुणी घेऊ शकणार नाही  आणि घेणार नाही. जगामधील सर्व देशातील आणि भारतामधील आत्ता पर्यंत होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधाना मध्ये एकमेव असे आदरणीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत.
  खरंच असा पंतप्रधान परत भारताला लाभणार नाही असे त्यांनी  पत्रकारांना आपली  प्रतिक्रिया दिली.
 येणाऱ्या काळामध्ये शिवधर्म फाउंडेशन च्या माध्यमातून  इंदापूर तालुका व महाराष्ट्रात आणि भारत देशात कुठे ही गरज भासल्यास शिवधर्म फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आरोग्यदूत म्हणून काम करणार आहेत जिथे लागेल तेथे मदत करणार आहेत असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
 इंदापूर तालुका आणि महाराष्ट्र व भारत देशातील जनतेला आव्हान आहे की , आपण स्वतः स्वतःची काळजी घ्या.  आपल्या परिवाराची काळजी घ्या. आपल्या नातेवाईक काळजी घ्या. पोलीस,  डॉक्टर , नर्सताई,  अंगणवाडी सेविका ,  अंगणवाडी मदतनीस , पत्रकार ही सर्व मंडळी अहोरात्र लोकांना कुठलाही  त्रास होऊ नये .  लोकांच्या जीवला धोका निर्माण  होऊ  नये,  लोकांना कोरोना व्हायरस  हा आजार  होऊ नये म्हणून रात्रंदिवस झटत आहेत.        
त्या सर्वांना साथ देणे आपलं कर्तव्य आहे आणि आपली काळजी स्वतःची घेतली पाहिजेल असे त्यांनी विचार  व्यक्त केले. जिथे जिथे मदत लागेल तेथे  सरकारी यंत्रणेनी  सुद्धा आमच्या शिवधर्म फाऊंडेशनच्या प्रत्येक गावातील अध्यक्ष,  उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते किंवा आम्हाला सुद्धा तात्काळ कळवावे. जिथे मदत लागले तिथे आमचा कार्यकर्ता आरोग्यदूत म्हणून काम करण्यास तयार आसेलं असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
 येणाऱ्या काळामध्ये अनेक सामाजिक प्रश्नासाठी,  शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी , शिवधर्म फाउंडेशन मोठ्याप्रमाणावर लढा उभारणार आहे आणि शेतकरी व सामाजिक घटकांना न्याय द्यायचं ही काम करणार आहे.
  शिवधर्म फाउंडेशन प्रत्येक गावात,  तालुका , जिल्हा आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा ओपन केली असून  हजारो युवकांचे एकजुटीने संपर्क ठेवून हे संघटना काम करत आहे. शिवधर्म फाउंडेशन जे  काम करत आहे त्या कामाबद्दल अनेक सामाजिक संघटना व नागरिकांकडून कौतुक होत आहे. शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माध्यमातून इंदापूर तहसील कचेरी येथे सुविधा सेतु मध्ये होणारा भ्रष्टाचार या संदर्भात खूप मोठा आंदोलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे रक्तदान शिबिर घेतले होते  इंदापूर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमीत कमी  २, ४०० बाटल्या रक्त जमा करण्याचे काम शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
  अशा अनेक सामाजिक कामाला शिवधर्म प्राधान्य देणारा आहे असं आपलं मत त्यांनी व्यक्त केलं आहे  .पुन्हा एकदा सर्व इंदापूर तालुक्यातील व महाराष्ट्र आणि भारत देशातील जनतेला नम्रपणे आव्हान आहे. आपण सर्वांनी शासनाने संचारबंदी व जे  नेम घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन करू नका . पोलिस , डॉक्टर , पत्रकार , नर्स, या सर्वांना सहकार्य करा.
 किराणामाल खरेदी करत असतानां किरणा माला घेतानां,  किराणा दुकानदारांनी आणि ग्राहकांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजेल. ज्या गोडाऊन मधून किराणामाल पोच केला जातो तिथून काळजी घेऊन दुकानदारा पर्यंत पोहोचेपर्यंत काळजी घेतली पाहिजेल. तिथून पुढे दुकानदारांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजेल आणि ग्राहकांनी माल घेतानां काळजी घेतली पाहिजेल असे त्यांनी आपल्या विचार व्यक्त   केले . भाजीपाला खरेदी करत असताना   आत्यावश्यक वस्तू खरेदी करत असताना दोन माणसांमध्ये अंतर ठेवून खरेदी केला पाहिजेल. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि जे आपल्यासाठी आहोरात्र , रात्रंदिवस झटत आहेत त्यांचे अभिनंदन करून  त्यांना सहकार्य करा असे दिपकआण्णा  काटे  शिवधर्म फाऊंडेशन संस्थापक,  अध्यक्ष यांनी केले.
*********************************************

लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे 9423212127
शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर
9860976747

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...