मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात शासनाकडे मदतीची हाक ; 

इंदापूर :तालुक्यातील सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी , निरवांगी , निमगांव केतकी अशा अनेक गावांमध्ये अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कक्कुटपालन व्यवसाय करतात. काही शेतकऱ्याकडे कंपनीने दिल्याले पक्षी म्हणजे कोंबड्या काही शेतकऱ्यांनी असून काही शेतकऱ्यांचा स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात .कोरोना आजारामुळे अफवा पसरली की कोंबडी पासून कोरोना आजार होतो यामुळे कोणी चिकन , कोंबडी खरेदी करायला तयार नाही याचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठा बसला आहे . शेतकऱ्याचं कंबरडेच मोडलं आहे . देशात संचारबंदी असल्याने आणि वाहतूक बंद आसल्याने व्यापारी यांनी कोंबडी खरेदीकडे पाठ फिरवल्याने आणि अफवेमुळे अतिशय भयंकर इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे .आमचे प्रतिनिधी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मवर भेट देऊन माहिती घेतली असता ४० दिवसात कोंबडीचा लाँट घेऊन जाणारी कंपनी आणि व्यापारी ८५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांचा माल नेहण्यास नकार दिला आहे. कोंबडीचे वजन दोन ते अडीच किलोच्या आसपास झाले कि खरेदी-विक्रीसाठी कंपनी व व्यापारी घेऊन जातात . सध्या जवळजवळ कोंबडीचे वजन तीन किलो ते साडेचार किलो झालं आहे . अनेक कोबंड्या (पक्षी ) मरू लागले आहेत . कंपनीने हात वर केल्याने शेतकऱ्याला स्वतःचं खाद्य द्यावे लागत आहे. काही शेतकऱ्याला खाद्य व कुक्कुटपालन साठी जे तुस खत लागतं हे सुद्धा परवडतं नाही .

 तुस ह्या खताचा व्यापार करणाऱ्या व्यापारी ही अतिशय मोठं संकटात सापडला आहे . अनेक टन माल खरेदी केल्याला एका जागेवर पडून असल्यामुळे तो मालाचा नुसकान होत आहे . अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नेमक काय करावं. अवकाळी पावसाचा तडाखा आणि दररोज शेकडो कोंबड्या मरतात त्याची विल्हेवाट लावतानां शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. तीन-साडेतीन हजार कोबंडी (पक्षी ) यांच्यापासून तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळणार होते . आता झालेला खर्चही निघणार नाही. काही शेतकऱ्यांना या व्यवसायामध्ये सहा ते सात लाख रुपये उत्पन्न भेटणार होते तेथे एक पट खर्चसुद्धा निघणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे . वीस रुपयाला एक पक्षी( कोंबडी ) या दराने व्यापारी मागतात ८० रुपये किलो चिकन व्यापारी विकतात. दोनशे रुपये किलोनी मार्केटमध्ये चिकन विकत होते ते आता ८० रुपयांवर आले. फुकट कोणी कोबंडी (पक्षी ) नेह्याला तयार नाही . सराफवाडी येथील कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी बंडु जाधव, विजय जाधव आणि हिराचंद घाडगे यांनी आमच्या प्रतिनिधीला आपले दुःख भरी व्यथा त्यांनी सांगितली . कोबंडी (पक्षी) मरतात त्याचं काय करायचं खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे रात्रभर झोप येत नाही. चार चार, पाच हजार कोंबड्या ( पक्षी ) आहेत . हजारो-लाखो कोंबड्याचं करायचं काय हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण आमच्यापुढे झाला आहे. आमची सरकारकडे एक मागणी आहे की , सरकारी यंत्रणेनी तालुका लेवला सर्वे करून , जिल्हा, मंत्रालयात सरकारकडे पाठपुरावा करून तात्काळ आम्हाला मदत करावी. आमचा खर्च तरी भेटावा यासाठी काही तरी लवकरात लवकर प्रयत्न करावेत. 
आधीचं अनेक वर्ष दुष्काळ , परत ओला दुष्काळ नंतर आता अवकाळी पावसाचा तडाखा यात पिकांचं नुसकान व शेतकऱ्यांच्या माला भाव नाही . शेतकरी आत्महत्या सारख्या गंभीर प्रश्न निर्माण होतो . परत कुक्कुटपालन व्यवसायावरती एवढं मोठं संकट नेमकं शेतकऱ्यांनी कोणाकडे हात पसरावा. जगाचा पोशिंदा यांच्या जिवनांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .
सरकार व आणि राज्यकर्त्यांनी तात्काळ कुक्कुटपालन व्यवसायाला मदत जाहीर करावी आशी मागणी केली आहे . हजारो बॉयलर व कलपक्षी कोंबड्यांचं नेमकं करायचं काय ? हा शेतकऱ्यानं पुढे प्रश्न पडलाय . कोरोना आजारामुळे कुणी कोंबडी , चिकन घ्यायला तयार नाही. संचारबंदीमुळे महाराष्ट्रात कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिशय अस्मानी संकट ओढावलं आहे . याची सरकारनी दखल घेऊन मदत करावी आशी शेतकऱ्यांनी सरकारला मदतीची हाक दिली आहे. त्या हाकेला सरकार कशी साथ देईल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागलं आहे . शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी असे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. 


********************************************

विलासराव गाढवे 9423212127
धनंजय कळमकर 9860976747


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...