इंदापूर महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने अमर शेख हॉल येथे "सेफ हँडलिंग ऑफ केमिकल्स" या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयश्री गटकुळ यांनी केले आणि प्रा. श्वेता खोपडे खोपडे, प्रा.रोहित घाटगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थाध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रमुख वक्ते अनिकेत भुजबळ यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.औद्योगिक क्षेत्र रसायनशास्त्र विषयावर अवलंबून असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण भवितव्य आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिते साठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहेअसे मत डॉ जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले. रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना केमिकल आणि फार्मास्युटिकल कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. रसायन ज्वलनशील आणि विषारी असतील तर विद्यार्थांनी केमिकल्स हाताळताना संरक्षणात्मक हातमोजे, चष्मा आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन अनिकेत भुजबळ यांनी केले.डॉ.जीवन सरवदे,डॉ.राजेंद्र भोसले,डॉ.एम.पी. शिंदे,प्रा.योगेश झगडे, सचिन खरात प्रा.प्रांजली माने, प्रा.कविता देवकाते, प्रा.फर्जना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम साठी सारिका चव्हाण आणि संतोष खाडे यांनी अथक परिश्रम घेतले, प्रा सचिन खरात यांनी आभारप्रदर्शन केले.
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या