मुख्य सामग्रीवर वगळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे "जागतिक दर्जाचे स्मारक" उभारावे, ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी.

इंदापूर, प्रतिनिधी. संदेश शहा.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी मौजे चौंडी ( ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे "जागतिक दर्जाचे स्मारक" उभा करावे, त्यासाठी चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित विभागास ५०० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करून मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री भरणे यांनी दिनांक २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले.
या निवेदनात मंत्री भरणे यांनी म्हटले आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष सध्या साजरे होत असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व योगदानाचा समयोचित गौरव करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म मौजे चौंडी ( ता. जामखेड, जि. अहिल्यानगर ) येथे झाला. धनगर समाजाच्या महान परंपरेतील त्या एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होत्या. शासनाच्या वतीने त्यांच्या स्मृतींचा जागर व्हावा, हा आमचा समाज म्हणून प्रामाणिक आग्रह आहे.
धनगर समाज ही हजारो वर्षापासून या देशात अस्तित्वात असलेली एक सशक्त, श्रमशील व संस्कृतीने समृद्ध अशी जमात आहे. शेती, पशु पालन, लोकजीवनातील योगदाना बरोबरच अनेक समाजसुधारक, योध्दे, संत, गायक, कलाकार या समाजातून उदयास आले आहेत. धनगर संस्कृतीचे वैभव, पोशाख, वेशभूषा, बोलीभाषा, लोककला, संगीत, धार्मिक परंपरा आणि जीवनपद्धती यामध्ये स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. त्यामुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली जीवनपट व धनगर समाजाची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि जीवनशैली आगामी पिढ्यांना पोहोचविण्या करिता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या "बंजारा विरासत" स्मारकाच्या धर्तीवर, " मौजे चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक" उभारण्याची समस्त धनगर समाजाच्या वतीने मी मागणी करत आहे. हे स्मारक केवळ एक सांस्कृतिक स्मारक न राहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास, धनगर समाजाच्या परंपरा, जीवनशैली, लोककला, साहित्य, संगीत आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे दस्तावेज जतन करणारे वैभवशाली इतिहासाचे प्रतीक ठरेल. या स्मारकाच्या माध्यमातून आगामी पिढीला आपल्या मूळ परंपरा, संस्कृती व इतिहासाची जाणीव होईल. त्यातून त्यांना पुढील वाटचाली साठी प्रेरणा मिळेल. हे स्मारक सामाजिक सशक्तीकरणासह सांस्कृतिक जागृतीचे कार्यही करेल. त्यामुळे
मौजे चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शासनाच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारून या करिता रूपये ५०० कोटी निधीची तरतूद करण्यात येण्या संदर्भातील प्रस्ताव ठेवण्याबाबत संबंधित विभागास आपल्या स्तरावरून सूचना व्हाव्यात, अशी सर्व धनगर समाजाच्या वतीने मंत्री श्री. भरणे यांनी विनंती केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते